पुढील दोन आठवडे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

भात रोपांची पेरणी लवकर पूर्ण करून घेण्याचा सल्ला


पालघर : पालघर जिल्ह्यात १६ जून रोजी नैऋत्य मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ व २२ जून रोजी पावसाचे प्रमाण थोडे कमी होण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी उघडीपही राहू शकते. २३ जूननंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. २४ ते २६ जून दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


तसेच, २७ जून ते ३ जुलै या कालावधीत देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. ही माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ रिझवाना सय्यद यांनी दिली आहे. या कालावधीत किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे, तर कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर राहील. वाऱ्याचा वेग २३ ते २५ जूनदरम्यान २० किमी प्रतितास इतका वाढण्याची शक्यता असून, त्याचा फळबागांवर परिणाम होऊ शकतो.


या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य त्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. दि. २१ आणि २२ जून रोजी पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने भात रोपवाटीकेची पेरणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी केले आहे.


गादी वाफ्यावर भात पेरणी करताना चारही बाजूंनी खोल चर काढावेत जेणेकरून जास्त पावसातही पाण्याचा निचरा होईल आणि कोवळी रोपे सडण्याचे प्रमाण कमी राहील. नुकतीच लागवड केलेल्या झाडांना काठीचा आधार देऊन बांधणी करावी व मातीची भर टाकावी. निचऱ्याची व्यवस्था करून ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.


Comments
Add Comment

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या

राज्यातील भाजपा खासदाराचा पहाटे भीषण अपघात, एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले

पालघर : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (MP Dr.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

Vasai - Virar Crime : वसई–विरारमध्ये मृतदेह सापडण्यांची मालिका सुरूच; १५ दिवसांत ६ घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वसई-विरार : वसई-विरार आणि नालासोपारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी गंभीर