Debt on US : अमेरिकेवर ३७ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त कर्ज, भारताकडूनही घेतले आहे कर्ज

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेवर ३७ ट्रिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त कर्ज आहे. अमेरिकेने भारत, चीन, जपान या आशियातील देशांकडूनही कर्ज घेतले आहे. दरवर्षी अमेरिका कर्जाचे व्याज भरण्यासाठी एक ट्रिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त पैसे खर्च करत आहे. अमेरिकेच्या कर्जाबाबतची ही आकडेवारी शुक्रवार २० जून २०२५ रोजी जाहीर झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. धातू (कमॉडिटी) स्वरुपातील सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. जगभरातील ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ होत आहे. ब्रिक्स देश स्वतःचे स्वतंत्र चलन कार्यरत करण्याचा विचार करत आहेत. काही देशांनी एकमेकांशी आयात - निर्यात करण्यासाठी फक्त एकमेकांच्या चलनाचाच विचार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे जगाचे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी झाले आणि त्याचवेळी कर्जाचा भार वाढला तर अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेने आर्थिक सुधारणा केल्या नाही तर देशावरील कर्जाचा भार २०५५ पर्यंत जीडीपीच्या १५६ टक्के वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे. सध्या दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलरची तूट दरवर्षी अमेरिकेच्या कर्जात वाढ करत आहे. एकूण कर उत्पन्नाच्या जवळजवळ एक चतुर्थांश भाग आता कर्ज परतफेडीवर खर्च होत आहे. सामाजिक सुरक्षा, वैद्यकीय सेवा, राष्ट्रीय संरक्षण आणि पायाभूत सुविधांसाठी कमी पैसा उपलब्ध होत आहे. वाढत्या कर्जामुळे अमेरिकेतील खासगी गुंतवणुकीत घट होण्याचाही धोका आहे. कर्जाचा बोजा नियंत्रित केला नाही तर पुढील दशकात जीडीपी ३४० अब्ज अमेरिकन डॉलरने कमी होण्याचा धोका आहे. यामुळे अमेरिकेतील १२ लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. वेतनवाढ मंदावण्याचीही शक्यता आहे. अमेरिकेच्या जीडीपीमध्ये यंदाच्या वर्षी १.४ ते १.६ टक्के एवढीच वाढ होण्याची शक्यता आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढत असल्यामुळे अमेरिकेच्या धोरणकर्त्यांच्या चिंतेत भर पडत आहे.

भारताकडे सध्या सुमारे २० लाख कोटी रुपयांचे अमेरिकेचे सरकारी रोखे अर्थात यूएस ट्रेझरी बाँड आहेत. सोप्या शब्दात समजून घ्यायचे तर यूएस ट्रेझरी बाँड खरेदी करुन भारताने अप्रत्यक्षपणे अमेरिकेला सुमारे २० लाख कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
Comments
Add Comment

अखेर स्वप्न पूर्ण, भारताने जिंकला महिला विश्वचषक; दीप्तीने घेतल्या ५ विकेट

नवी मुंबई : अखेर भारताचे स्वप्न साकार झाले. भारताच्या महिला संघाने आयसीसी वर्ल्डकप पहिल्यांदाच जिंकला. नाणेफेक

बंडगार्डनमध्ये भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू ; तिसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : रविवारी पहाटे बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

अजित पवार सलग चौथ्यांदा राज्याच्या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सलग चौथ्यांदा राज्याच्या

नौदलासाठी इस्रोने प्रक्षेपित केला उपग्रह

श्रीहरिकोटा : भारतीय नौदलाठी इस्रोने LVM3-M5/CMS-03 या रॉकेटमधून एका उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप

स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, मोडला मिताली राजचा विक्रम

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियम येथे सुरू असलेल्या आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ च्या फायनल मॅचमध्ये भारतीय