Kokan Railway: कोकण रेल्वेचे गणपती स्पेशल आरक्षण २३ जूनपासून

रत्नागिरी : कोकणात मोठ्या स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे जादा गाड्यांसह नियमित गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण २३ जूनपासून सुरू होत आहे.

कोकणात साजरा होणारा गणेशोत्सव मागील वर्षीपेक्षा यावर्षी लवकरच म्हणजे दि. २७ ऑगस्टला साजरा होणार आहे. यासाठी कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी ६० दिवस आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करावे लागणार आहे. कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे आरक्षण २३ जूनपासून सुरू करावे लागणार आहे.


दि. २५ आणि दि. २६ ऑगस्टला कोकणात पोहचण्यासाठी त्या दोन दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी असते.कोकणात जाण्यासाठी रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत असल्यामुळे मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर २५०हून अधिक गणपती स्पेशल गाड्यांना सोडते, या गाड्यांनादेखील मोठी गर्दी असते. मुंबई-गोवा मार्गाची अवस्था अद्यापही बिकट असल्यामुळे यावर्षीदेखील जास्त चाकरमानी रेल्वेतून प्रवास करण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने कोकण रेल्वेकडून तयारीला सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य

Fake cotton seeds : खरीपच्या तोंडावर मोठा घोटाळा उघड ! जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांचा साठा जप्त

Fake cotton seeds : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.

PM Suryaghar Yojana : सौर ऊर्जेत महाराष्ट्राची दमदार झेप ! पीएम सूर्यघर योजनेत ८ राष्ट्रीय पुरस्कार; जळगाव देशात टॉप-१० मध्ये

PM Suryaghar Yojana : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने (Maharashtra) देशभरात आपली वेगळी छाप उमटवली