India vs England: आजपासून भारत वि इंग्लंड कसोटीला सुरूवात, पाहा किती वाजता सुरू होईल सामना

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार २० जूनपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडला हरवण्यासाठी सज्ज झाला आहे. लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

किती वाजता सुरू होणार सामना?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. तर सामन्याचा टॉस दुपारी तीन वाजता होईल. इंग्लंडने या सामन्यासाठी आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. तर भारताच्या प्लेईंग इलेव्हनची माहिती टॉरसनंतर समजेल.

जाणून घ्या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक


पहिली कसोटी २० ते २४ जून - लीड्स
दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबेस्टन
तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स
चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - ओव्हल

२००७ नंतर भारताने इंग्लंडमध्ये जिंकली नाही मालिका


भारताने इंग्लंडमध्ये शेवटची २००७मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. ही मालिका राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताने जिंकली होती. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत १३६ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील ५१ सामने इंग्लंडने जिंकलेत तर ३५ सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर ५० कसोटी सामने अनिर्णीत राहिलेत.
Comments
Add Comment

Asia Cup 2025 : पाकिस्तान 'सुपर-४' मध्ये, आता पुन्हा भारताशी होणार 'महामुकाबला'

दुबई: आशिया कप २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने यूएईचा ४१ धावांनी पराभव करत 'सुपर-४' फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले

पाकिस्तानच्या 'खोट्या' फुटबॉल संघाचा जपानमध्ये पर्दाफाश

इस्लामाबाद: एका फुटबॉल स्पर्धेत भाग घेण्यासाठी जपानमध्ये गेलेल्या पाकिस्तानच्या 'बनावट' फुटबॉल संघाला जपानी

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधनाची विक्रमी शतकी खेळी

चंदीगड : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना चमकदार कामगिरी करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आणि

Asia Cup 2025 : सुपर 4 मध्ये पोहोचताच टीम इंडियाला मिळाली आनंदाची आणखी एक बातमी

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळत असलेला भारतीय संघ एशिया कप 2025 च्या सुपर 4 फेरीत पोहोचला आहे. आता भारत

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स