India vs England: आजपासून भारत वि इंग्लंड कसोटीला सुरूवात, पाहा किती वाजता सुरू होईल सामना

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून म्हणजेच शुक्रवार २० जूनपासून सुरूवात होत आहे. या मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडला हरवण्यासाठी सज्ज झाला आहे. लीड्समध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

किती वाजता सुरू होणार सामना?


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. तर सामन्याचा टॉस दुपारी तीन वाजता होईल. इंग्लंडने या सामन्यासाठी आधीच प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे. तर भारताच्या प्लेईंग इलेव्हनची माहिती टॉरसनंतर समजेल.

जाणून घ्या संपूर्ण मालिकेचे वेळापत्रक


पहिली कसोटी २० ते २४ जून - लीड्स
दुसरी कसोटी २ ते ६ जुलै - एजबेस्टन
तिसरी कसोटी १० ते १४ जुलै - लॉर्ड्स
चौथी कसोटी २३ ते २७ जुलै - मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट - ओव्हल

२००७ नंतर भारताने इंग्लंडमध्ये जिंकली नाही मालिका


भारताने इंग्लंडमध्ये शेवटची २००७मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. ही मालिका राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारताने जिंकली होती. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत १३६ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यातील ५१ सामने इंग्लंडने जिंकलेत तर ३५ सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवलाय. तर ५० कसोटी सामने अनिर्णीत राहिलेत.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत