शास्ती माफी लवकरात लवकर लागू करा

  53

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी


पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शास्ती माफीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली असता शास्ती माफी लवकरात लवकर लागू करावी, जास्तीत जास्त शास्ती माफी देण्यात यावी आणि त्याचबरोबर पूर्वीच्या काळात ज्या


मालमत्ताधारकांनी शास्ती भरली आहे त्यांनाही पुढे भरायच्या करामधून आधी भरलेल्या शास्तीची रक्कम वगळण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. या संदर्भामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये नागरिकांनी भरलेली शास्ती पुढील टॅक्स भरणातून वगळण्यात आल्याची प्रकरणे असल्याबाबत माहिती दिली व त्याचा अभ्यास करून याबाबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली.


या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली आहे.

Comments
Add Comment

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

माणगावमध्ये वाहतूककोंडी, ठिकठिकाणी पोलिस तैनात

मुंबईमधून गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांमुळे सलग दुसऱ्या दिवशी माणगाव शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईना, इच्छुकांची कोंडी सोडवेना

माथेरान : माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळीसुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेच्या

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात