शास्ती माफी लवकरात लवकर लागू करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी


पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या टॅक्सच्या संदर्भामध्ये नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांनी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शास्ती माफीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली असता शास्ती माफी लवकरात लवकर लागू करावी, जास्तीत जास्त शास्ती माफी देण्यात यावी आणि त्याचबरोबर पूर्वीच्या काळात ज्या


मालमत्ताधारकांनी शास्ती भरली आहे त्यांनाही पुढे भरायच्या करामधून आधी भरलेल्या शास्तीची रक्कम वगळण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. या संदर्भामध्ये खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये नागरिकांनी भरलेली शास्ती पुढील टॅक्स भरणातून वगळण्यात आल्याची प्रकरणे असल्याबाबत माहिती दिली व त्याचा अभ्यास करून याबाबत पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना दिलासा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली.


या संदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या बैठकीत केली आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग