Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

  97

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहते.

योगामुळे शरीर निरोगी आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदतो. दरम्यान, योगा करण्याआधी आणि केल्यानंतर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याचे आपल्या शरीरास फायदेच होतात.

आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत जे योगाच्या आधी आणि नंतर खाल्ले पाहिजेत. यासोबत हे ही जाणून घेऊया की योगाच्या किती वेळाआधी आणि नंतर खाल्ले पाहिजे.

योगाच्या किती वेळ आधी खावे


कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी आणि योग्य प्रकारे योगा करायचा असेल कर कमीत कमी ४५ मिनिटे आधी खाल्ले पाहिजे. संपूर्ण जेवण घेण्याऐवजी हलका नाश्ता घ्या. यामुळे शरीरास एनर्जी मिळेल. तुम्ही मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी अगदी सहज प्रोटीन बार अथवा प्रोटीन शेक पिऊ शकता.

काय खाल?


मूठभर नट्स, ताजी फळे, स्मूदी, नारळपाणी, लिंबू पाणी, दही, ज्यूस, अंडी तसेच एक वाटी सलाडही तुम्ही योगाच्या आधी खाऊ शकता.

किती वेळ खाऊ नये?


योगा आणि जेवण यांच्यात कमीत कमी ३० ते ४० मिनिटांचे अंतर असले पाहिजे. म्हणजेच योगा केल्यानंतर कमीत कमी ३० ते ४० मिनिटांपर्यंत काही खाऊ नये. योगानंतर तुम्हाला एनर्जेटिक राहण्यासाठी प्रोटीन, कार्ब्स, आणि इतर पोषकतत्वांनी भरपूर पदार्थ खाल्ले पाहिजेत.

जर तुम्ही सकाळी लवकर योगा करत असाल तर तुम्ही नाश्त्यात पोहे, सँडविच, फळांसोबत दलिया, उकडलेली अंडी, फळे तसेच भाज्या यांचे सेवन केले पाहिजे.

जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर क्विनोआ उपमा, चिला, व्हेजिटेबल शेवया, सूप, पनीर भुर्जी, खिचडी आणि चिकनसोबत फ्राय भाज्या यासारखा पौष्टिक आहार घेऊ शकता.

 
Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत