Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहते.

योगामुळे शरीर निरोगी आणि अॅक्टिव्ह राहण्यास मदतो. दरम्यान, योगा करण्याआधी आणि केल्यानंतर कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. याचे आपल्या शरीरास फायदेच होतात.

आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल सांगत आहोत जे योगाच्या आधी आणि नंतर खाल्ले पाहिजेत. यासोबत हे ही जाणून घेऊया की योगाच्या किती वेळाआधी आणि नंतर खाल्ले पाहिजे.

योगाच्या किती वेळ आधी खावे


कोणत्याही समस्येपासून वाचण्यासाठी आणि योग्य प्रकारे योगा करायचा असेल कर कमीत कमी ४५ मिनिटे आधी खाल्ले पाहिजे. संपूर्ण जेवण घेण्याऐवजी हलका नाश्ता घ्या. यामुळे शरीरास एनर्जी मिळेल. तुम्ही मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी अगदी सहज प्रोटीन बार अथवा प्रोटीन शेक पिऊ शकता.

काय खाल?


मूठभर नट्स, ताजी फळे, स्मूदी, नारळपाणी, लिंबू पाणी, दही, ज्यूस, अंडी तसेच एक वाटी सलाडही तुम्ही योगाच्या आधी खाऊ शकता.

किती वेळ खाऊ नये?


योगा आणि जेवण यांच्यात कमीत कमी ३० ते ४० मिनिटांचे अंतर असले पाहिजे. म्हणजेच योगा केल्यानंतर कमीत कमी ३० ते ४० मिनिटांपर्यंत काही खाऊ नये. योगानंतर तुम्हाला एनर्जेटिक राहण्यासाठी प्रोटीन, कार्ब्स, आणि इतर पोषकतत्वांनी भरपूर पदार्थ खाल्ले पाहिजेत.

जर तुम्ही सकाळी लवकर योगा करत असाल तर तुम्ही नाश्त्यात पोहे, सँडविच, फळांसोबत दलिया, उकडलेली अंडी, फळे तसेच भाज्या यांचे सेवन केले पाहिजे.

जर तुम्ही संध्याकाळी योगा करत असाल तर क्विनोआ उपमा, चिला, व्हेजिटेबल शेवया, सूप, पनीर भुर्जी, खिचडी आणि चिकनसोबत फ्राय भाज्या यासारखा पौष्टिक आहार घेऊ शकता.

 
Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या