पावसाळी पर्यटनावर वन विभागाचा लगाम

  44

राष्ट्रीय उद्यान परिसरात बंदी; धबधब्यांवर गेल्यास होणार कठोर कारवाई


ठाणे : पावसाळा सुरू होताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसर हिरवाईने नटलेल्या जंगलातील सौंदर्य पर्यटकांना खुणावत. अनेक जण येथे भटकंती, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग, ‘ट्रेकिंग’ किंवा ‘रिल्स’ बनवण्यासाठी गर्दी करू लागतात. विशेषतः पावसामुळे जिवंत झालेल्या झऱ्यांमुळे निर्माण होणारे धबधबे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात्र याच धबधब्यांचा आनंद काही वेळा जीवघेणा ठरू शकतो याच पार्श्वभूमीवर वन विभागाने अशा जागेत जाण्यासाठी प्रतिबंध केला आहे. मागील काही वर्षांत धबधब्याजवळ घडलेल्या अपघाती घटनांमध्ये काही तरुणांचे बळी गेले आहेत.


अचानक वाढलेला पाण्याचा प्रवाह, निसरडी दगडमाती, अंदाज न येणारे खोलगट भाग, आणि सेल्फी घेण्याच्या नादात मृत्यूच्या दाढेत ओढले आहे. या साऱ्यामुळे ही ठिकाणं धोकादायक ठरत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, ठाणे वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी पावसाळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत.



अनधिकृत प्रवेशमार्गांवर विशेष लक्ष


धबधब्याजवळ जाणे, उशिरा पर्यंत थांबणे, मद्यप्राशन करून जंगल परिसरात फिरणे किंवा मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी अतिक्रमण करणे, या साऱ्यांवर आता बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. वन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे, जंगलात गस्त घालणारे पथक, तसेच स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने योजना आखली आहे. जंगलात कोणतेही अनधिकृत प्रवेशमार्ग वापरले जात असल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
- मयुर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर