पावसाळी पर्यटनावर वन विभागाचा लगाम

राष्ट्रीय उद्यान परिसरात बंदी; धबधब्यांवर गेल्यास होणार कठोर कारवाई


ठाणे : पावसाळा सुरू होताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसर हिरवाईने नटलेल्या जंगलातील सौंदर्य पर्यटकांना खुणावत. अनेक जण येथे भटकंती, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग, ‘ट्रेकिंग’ किंवा ‘रिल्स’ बनवण्यासाठी गर्दी करू लागतात. विशेषतः पावसामुळे जिवंत झालेल्या झऱ्यांमुळे निर्माण होणारे धबधबे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात्र याच धबधब्यांचा आनंद काही वेळा जीवघेणा ठरू शकतो याच पार्श्वभूमीवर वन विभागाने अशा जागेत जाण्यासाठी प्रतिबंध केला आहे. मागील काही वर्षांत धबधब्याजवळ घडलेल्या अपघाती घटनांमध्ये काही तरुणांचे बळी गेले आहेत.


अचानक वाढलेला पाण्याचा प्रवाह, निसरडी दगडमाती, अंदाज न येणारे खोलगट भाग, आणि सेल्फी घेण्याच्या नादात मृत्यूच्या दाढेत ओढले आहे. या साऱ्यामुळे ही ठिकाणं धोकादायक ठरत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, ठाणे वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी पावसाळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत.



अनधिकृत प्रवेशमार्गांवर विशेष लक्ष


धबधब्याजवळ जाणे, उशिरा पर्यंत थांबणे, मद्यप्राशन करून जंगल परिसरात फिरणे किंवा मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी अतिक्रमण करणे, या साऱ्यांवर आता बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. वन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे, जंगलात गस्त घालणारे पथक, तसेच स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने योजना आखली आहे. जंगलात कोणतेही अनधिकृत प्रवेशमार्ग वापरले जात असल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
- मयुर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

Comments
Add Comment

‘आपला दवाखान्या’चा वापर अन्य ‘उद्योगां’साठी

पगार थकला; आमदार संजय केळकर यांच्याकडे तक्रारी ठाणे  : ठाणे शहरात ४० ठिकाणी सुरू करण्यात आलेला 'आपला दवाखाना' हा

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील