पावसाळी पर्यटनावर वन विभागाचा लगाम

राष्ट्रीय उद्यान परिसरात बंदी; धबधब्यांवर गेल्यास होणार कठोर कारवाई


ठाणे : पावसाळा सुरू होताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसर हिरवाईने नटलेल्या जंगलातील सौंदर्य पर्यटकांना खुणावत. अनेक जण येथे भटकंती, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग, ‘ट्रेकिंग’ किंवा ‘रिल्स’ बनवण्यासाठी गर्दी करू लागतात. विशेषतः पावसामुळे जिवंत झालेल्या झऱ्यांमुळे निर्माण होणारे धबधबे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात्र याच धबधब्यांचा आनंद काही वेळा जीवघेणा ठरू शकतो याच पार्श्वभूमीवर वन विभागाने अशा जागेत जाण्यासाठी प्रतिबंध केला आहे. मागील काही वर्षांत धबधब्याजवळ घडलेल्या अपघाती घटनांमध्ये काही तरुणांचे बळी गेले आहेत.


अचानक वाढलेला पाण्याचा प्रवाह, निसरडी दगडमाती, अंदाज न येणारे खोलगट भाग, आणि सेल्फी घेण्याच्या नादात मृत्यूच्या दाढेत ओढले आहे. या साऱ्यामुळे ही ठिकाणं धोकादायक ठरत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, ठाणे वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी पावसाळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत.



अनधिकृत प्रवेशमार्गांवर विशेष लक्ष


धबधब्याजवळ जाणे, उशिरा पर्यंत थांबणे, मद्यप्राशन करून जंगल परिसरात फिरणे किंवा मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी अतिक्रमण करणे, या साऱ्यांवर आता बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. वन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे, जंगलात गस्त घालणारे पथक, तसेच स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने योजना आखली आहे. जंगलात कोणतेही अनधिकृत प्रवेशमार्ग वापरले जात असल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
- मयुर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या