पावसाळी पर्यटनावर वन विभागाचा लगाम

  36

राष्ट्रीय उद्यान परिसरात बंदी; धबधब्यांवर गेल्यास होणार कठोर कारवाई


ठाणे : पावसाळा सुरू होताच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसर हिरवाईने नटलेल्या जंगलातील सौंदर्य पर्यटकांना खुणावत. अनेक जण येथे भटकंती, फोटोग्राफी, व्हिडीओ शूटिंग, ‘ट्रेकिंग’ किंवा ‘रिल्स’ बनवण्यासाठी गर्दी करू लागतात. विशेषतः पावसामुळे जिवंत झालेल्या झऱ्यांमुळे निर्माण होणारे धबधबे हे नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात्र याच धबधब्यांचा आनंद काही वेळा जीवघेणा ठरू शकतो याच पार्श्वभूमीवर वन विभागाने अशा जागेत जाण्यासाठी प्रतिबंध केला आहे. मागील काही वर्षांत धबधब्याजवळ घडलेल्या अपघाती घटनांमध्ये काही तरुणांचे बळी गेले आहेत.


अचानक वाढलेला पाण्याचा प्रवाह, निसरडी दगडमाती, अंदाज न येणारे खोलगट भाग, आणि सेल्फी घेण्याच्या नादात मृत्यूच्या दाढेत ओढले आहे. या साऱ्यामुळे ही ठिकाणं धोकादायक ठरत आहेत. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, ठाणे वन विभाग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी पावसाळी पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत.



अनधिकृत प्रवेशमार्गांवर विशेष लक्ष


धबधब्याजवळ जाणे, उशिरा पर्यंत थांबणे, मद्यप्राशन करून जंगल परिसरात फिरणे किंवा मोबाईलवर व्हिडीओ शूटिंग करण्यासाठी अतिक्रमण करणे, या साऱ्यांवर आता बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. नियमभंग करणाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. वन विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे, जंगलात गस्त घालणारे पथक, तसेच स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने योजना आखली आहे. जंगलात कोणतेही अनधिकृत प्रवेशमार्ग वापरले जात असल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
- मयुर सुरवसे (वनपरिक्षेत्र अधिकारी येऊर)

Comments
Add Comment

ठाण्यात अवघ्या २० लाखांत स्वप्नातले घर

म्हाडाकडून तब्बल ६२४८ घरांसाठी लॉटरी ठाणे  : ठाण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हाडा

ठाणे-पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या उभारणीत ऐतिहासिक टप्पा

साखरे गावात देशातील सर्वात जड बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसवला ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या

शहापुरात ३२७ गाव-पाड्यांमध्ये स्मशानभूमीची गैरसोय

पावसाळ्यात मृतदेहाचे दहन करण्याचा प्रश्न गंभीर शहापूर : आदिवासी नागरिकांचे प्रमाण जास्त असणाऱ्या शहापूर

ठाणे-पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या उभारणीत ऐतिहासिक टप्पा

साखरे गावात देशातील सर्वात जड बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसवला ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या

ठाणे महापालिकेच्या ३३ अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

सीआरझेड क्षेत्रातील बांधकामेही उद्ध्वस्त ठाणे : उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट

खचलेल्या रस्त्याचे काम नियमानुसार नसल्याचे मनपाला एमएमआरडीएचे पत्र

भाईंदर : भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक भागातील रस्ता खचून झालेल्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डरवर गुन्हा