‘म्हाडा’च्या जनता दरबारात १० तक्रारींचे निवारण

मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तत्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी झालेल्या तिसऱ्या जनता दरबार दिनात एकूण १० तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात येऊन सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात झालेल्या या लोकाभिमुख उपक्रमात, गायकर यांनी अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निवारण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले.


नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ‘नागरिकांच्या तक्रारींचे निवारण’ या महत्त्वपूर्ण घटकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले.


या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करत कोकण मंडळाने तिसरा जनता जनता दरबार दिन घेत शासनाच्या जनकल्याणकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचा प्रत्यय दिला.


लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद यांना अधोरेखित करणारी ही अभिनव संकल्पना पुढे नेण्याचा निर्धार कोकण मंडळाने केला आहे. काल झालेल्या जनता दरबार दिनात, देखभाल शुल्क समायोजित करणे, विक्री किंमत भरण्यास उशीर झाल्यामुळे आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम परत करण्यात यावी, सोसायटी लवकर स्थापन करण्यास परवानगी देण्याबाबत सहकार उपनिबंधकांनी कार्यवाही करावी, म्हाडा वसाहतीतील समस्या सोडविणे आदींबाबत अर्ज प्राप्त झाले. गायकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

Comments
Add Comment

Kunal Shah : मुंबईकर कुणाल शाह चर्चेत; FreeCharge ते CRED असा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : विल्सन कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंटचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुंबईकर कुणाल

Mumbai Rain : जुलैमधील पावसावर मुंबईकरांचे भविष्य

पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची हजेरी लागणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत (Mumbai )मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस

BMC : मुंबईत पाण्यावरून रान उठले

मुंबईतील रेनवॉटर हार्वेस्टींग योजनेतंर्गत सर्व इमारती, संकुलांचे ऑडीट करा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील (Mumbai)

Water Storage in Mumbai : जुलैच्या सरींकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या, तलावांत केवळ ८.५ टक्के पाणीसाठा; २० ऑगस्टपर्यंत पुरेल पाणी

मुंबई  : मुंबईत मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस पडेल. मात्र, हा पाऊस पडला तरी तो ३० जूनपर्यंत या संपूर्ण

IAS Transfer : पी. वेलरासू यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि महापारेषणमधील

Chandrakant Patil : पॉलीटेक्निक प्रवेश अर्जासाठी 2 जुलैपर्यंत मुदतवाढ; 1.45 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील मुंबई,  : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक)