पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता, संंरक्षित भिंतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद...

  43

मुंबई : मुंबईतील अनेक भागात झोपड्या उभ्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवर घडत असतात.  त्यात अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी संरक्षित जाळ्या आणि भिंती उभारण्याचा निर्णय घेतलाय... विशेष म्हणजे राज्य सरकारने दरडप्रवण क्षेत्र निश्चित करुन तेथे संरक्षण भिंती उभारण्याची जबाबदारी म्हाडाच्या (MHADA)  झोपडपट्टी सुधार मंडळ (Slum Improvement Board) आणि सार्वजनिक बांधकाम (Public works) विभागावर सोपविण्यात आली आहे.

काही झोपडपट्टी भागांमध्ये ९ मीटरच्या आतील भिंतीचे काम झोपडपट्टी सुधार मंडळ करणार आहे, तर ९ मीटरच्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी जिल्हा समितीकडून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या माहितीनुसार मुंबई शहरात एकून २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८० ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत १४ ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्याची कामे सुरु आहेत. राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी दरडप्रवण क्षेत्रात पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर कामे कशी पूर्ण केली जातील याचा आराखडा देखील तयार केला आहे. परंतू ज्या भागात कामे सुरु नाहीत त्या भागात जाळ्या बसविण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे कामाला सुरुवात...

पहिल्या १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम झोपडपट्टी सुधार मंडळाने हाती  घेतले आहे. अशी माहिती मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी दिली. गुरुनानक एरिया (एसबीएस मार्ग), जरीमरी साकीनाका (कुर्ला), हबीब नगर (अंधेरी), शांताराम तलाव (दिंडोशी), टाईम्स इंडिया इमारतीच्या मागे (कांदिवली), आदर्श चाळ (कांदिवली), उपाध्याय नगर (अंधेरी), रामगृह, श्रीराम मंदिर, श्री वैष्णव आश्रम (जोगेश्वरी), काकड इस्टेट सिद्धार्थ नगर (वरळी) आणि वाडी बंदर (डाॅकयार्ड) या १० ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे...

 

 

 

 
Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत