पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता, संंरक्षित भिंतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद...

  25

मुंबई : मुंबईतील अनेक भागात झोपड्या उभ्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवर घडत असतात.  त्यात अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी संरक्षित जाळ्या आणि भिंती उभारण्याचा निर्णय घेतलाय... विशेष म्हणजे राज्य सरकारने दरडप्रवण क्षेत्र निश्चित करुन तेथे संरक्षण भिंती उभारण्याची जबाबदारी म्हाडाच्या (MHADA)  झोपडपट्टी सुधार मंडळ (Slum Improvement Board) आणि सार्वजनिक बांधकाम (Public works) विभागावर सोपविण्यात आली आहे.

काही झोपडपट्टी भागांमध्ये ९ मीटरच्या आतील भिंतीचे काम झोपडपट्टी सुधार मंडळ करणार आहे, तर ९ मीटरच्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी जिल्हा समितीकडून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या माहितीनुसार मुंबई शहरात एकून २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८० ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत १४ ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्याची कामे सुरु आहेत. राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी दरडप्रवण क्षेत्रात पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर कामे कशी पूर्ण केली जातील याचा आराखडा देखील तयार केला आहे. परंतू ज्या भागात कामे सुरु नाहीत त्या भागात जाळ्या बसविण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे कामाला सुरुवात...

पहिल्या १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम झोपडपट्टी सुधार मंडळाने हाती  घेतले आहे. अशी माहिती मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी दिली. गुरुनानक एरिया (एसबीएस मार्ग), जरीमरी साकीनाका (कुर्ला), हबीब नगर (अंधेरी), शांताराम तलाव (दिंडोशी), टाईम्स इंडिया इमारतीच्या मागे (कांदिवली), आदर्श चाळ (कांदिवली), उपाध्याय नगर (अंधेरी), रामगृह, श्रीराम मंदिर, श्री वैष्णव आश्रम (जोगेश्वरी), काकड इस्टेट सिद्धार्थ नगर (वरळी) आणि वाडी बंदर (डाॅकयार्ड) या १० ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे...

 

 

 

 
Comments
Add Comment

उद्धव ठाकरे रंग बदलणारा सरडा - एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

मुंबई : बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेचा विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला. सरडाही रंग बदलतो, पण यांच्या

वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिरता दवाखाना, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : विठू नामाच्या गजरात,  ज्ञानोबाची पालखी खांद्यावर घेऊन अभंग गात, वारकरी भक्तीमध्ये भगवंताच्या नामस्मरणात

कच्च्या दुधासह चेहऱ्यावर लावा या ६ गोष्टी, चमकेल तुमची त्वचा

मुंबई: त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी महागडी ब्युटी उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय करणे अधिक फायदेशीर आहे. यातील एक

पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज

शाळा सुरू होताच मुंबईत ‘अवैध’ स्कूल व्हॅनचा सुळसुळाट; आरटीओचा उदासीनपणा कायम

मुंबई : शहरात शाळा पुन्हा सुरू होताच परवाना नसलेल्या, सुरक्षाहीन स्कूल व्हॅन्स पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या

पु.ल. देशपांडे कला अकादमीमध्ये स्वतंत्र संशोधन केंद्र सुरु, सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची माहिती...

महाराष्ट्रातील प्रयोगात्मक कलांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी राज्य सरकाने स्वतंत्र कला अकदामी केंद्र सरु