पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता, संंरक्षित भिंतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद...

मुंबई : मुंबईतील अनेक भागात झोपड्या उभ्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवर घडत असतात.  त्यात अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी संरक्षित जाळ्या आणि भिंती उभारण्याचा निर्णय घेतलाय... विशेष म्हणजे राज्य सरकारने दरडप्रवण क्षेत्र निश्चित करुन तेथे संरक्षण भिंती उभारण्याची जबाबदारी म्हाडाच्या (MHADA)  झोपडपट्टी सुधार मंडळ (Slum Improvement Board) आणि सार्वजनिक बांधकाम (Public works) विभागावर सोपविण्यात आली आहे.

काही झोपडपट्टी भागांमध्ये ९ मीटरच्या आतील भिंतीचे काम झोपडपट्टी सुधार मंडळ करणार आहे, तर ९ मीटरच्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी जिल्हा समितीकडून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या माहितीनुसार मुंबई शहरात एकून २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८० ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत १४ ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्याची कामे सुरु आहेत. राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी दरडप्रवण क्षेत्रात पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर कामे कशी पूर्ण केली जातील याचा आराखडा देखील तयार केला आहे. परंतू ज्या भागात कामे सुरु नाहीत त्या भागात जाळ्या बसविण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे कामाला सुरुवात...

पहिल्या १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम झोपडपट्टी सुधार मंडळाने हाती  घेतले आहे. अशी माहिती मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी दिली. गुरुनानक एरिया (एसबीएस मार्ग), जरीमरी साकीनाका (कुर्ला), हबीब नगर (अंधेरी), शांताराम तलाव (दिंडोशी), टाईम्स इंडिया इमारतीच्या मागे (कांदिवली), आदर्श चाळ (कांदिवली), उपाध्याय नगर (अंधेरी), रामगृह, श्रीराम मंदिर, श्री वैष्णव आश्रम (जोगेश्वरी), काकड इस्टेट सिद्धार्थ नगर (वरळी) आणि वाडी बंदर (डाॅकयार्ड) या १० ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे...

 

 

 

 
Comments
Add Comment

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मुंबईतल्या काँग्रेस आमदाराचे दोन मतदारयाद्यांमध्ये नाव, चोर कोण, दोष कुणाचा?

मुंबई: काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सध्या मतदारयाद्यांमधील घोळांचा पाढा वाचायला

सोन्याचे सफरचंद! किंमत १० कोटी, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुंबई: चक्क १० कोटींचे सफरचंद! हे ऐकून तुम्हाला पण धक्का बसला ना? मात्र हे खायचे सफरचंद नसून ते सोने आणि हिऱ्यांनी

Maharashtra Rain Update : पुढील २४ तास अतिधोक्याचे! ८ आणि ९ नोव्हेंबरला मोठे वादळ धडकणार; अनेक राज्यांमध्ये IMD कडून 'महा-अलर्ट' जारी!

मुंबई : राज्यात अखेर थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. पहाटेच्या वेळी तापमानात घट होऊन गारवा वाढल्याचे चित्र अनेक

मुंबईतील इतर भागांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई ?

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुलाबा कॉजवेवरील अनधिकृत फेरीवाले हटवले मुंबई (खास प्रतिनिधी) : कुलाबा कॉजवेवरील

मेट्रोंना विविध सेवा देणारी आता एकच कंपनी

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्राधिकरण आणि कंपन्यांचे मेट्रो प्रकल्पांचे एकत्रिकरण