पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता, संंरक्षित भिंतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद...

मुंबई : मुंबईतील अनेक भागात झोपड्या उभ्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवर घडत असतात.  त्यात अनेक नागरिकांना जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी संरक्षित जाळ्या आणि भिंती उभारण्याचा निर्णय घेतलाय... विशेष म्हणजे राज्य सरकारने दरडप्रवण क्षेत्र निश्चित करुन तेथे संरक्षण भिंती उभारण्याची जबाबदारी म्हाडाच्या (MHADA)  झोपडपट्टी सुधार मंडळ (Slum Improvement Board) आणि सार्वजनिक बांधकाम (Public works) विभागावर सोपविण्यात आली आहे.

काही झोपडपट्टी भागांमध्ये ९ मीटरच्या आतील भिंतीचे काम झोपडपट्टी सुधार मंडळ करणार आहे, तर ९ मीटरच्यावरील कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. त्यासाठी जिल्हा समितीकडून निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या माहितीनुसार मुंबई शहरात एकून २४९ दरडप्रवण क्षेत्र असून यातील ८० ठिकाणी सरंक्षक भिंती उभारण्याची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत १४ ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्याची कामे सुरु आहेत. राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी दरडप्रवण क्षेत्रात पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर कामे कशी पूर्ण केली जातील याचा आराखडा देखील तयार केला आहे. परंतू ज्या भागात कामे सुरु नाहीत त्या भागात जाळ्या बसविण्याचे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे कामाला सुरुवात...

पहिल्या १० ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम झोपडपट्टी सुधार मंडळाने हाती  घेतले आहे. अशी माहिती मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांनी दिली. गुरुनानक एरिया (एसबीएस मार्ग), जरीमरी साकीनाका (कुर्ला), हबीब नगर (अंधेरी), शांताराम तलाव (दिंडोशी), टाईम्स इंडिया इमारतीच्या मागे (कांदिवली), आदर्श चाळ (कांदिवली), उपाध्याय नगर (अंधेरी), रामगृह, श्रीराम मंदिर, श्री वैष्णव आश्रम (जोगेश्वरी), काकड इस्टेट सिद्धार्थ नगर (वरळी) आणि वाडी बंदर (डाॅकयार्ड) या १० ठिकाणी जाळ्या बसविण्यात येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे...

 

 

 

 
Comments
Add Comment

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास

Smruti Mandhana And Palash muchhal : स्मृती मानधना–पलाश मुच्छल पुन्हा एकत्र? बांद्र्यातील 'त्या' व्हिडिओने चर्चांना उधाण

मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला