मुंबई : विठू नामाच्या गजरात, ज्ञानोबाची पालखी खांद्यावर घेऊन अभंग गात, वारकरी भक्तीमध्ये भगवंताच्या नामस्मरणात मग्न झालेला असतो. वारकऱ्यांची आरोग्याची दखल घेत, वारकऱ्यांसाठी फिरता दवाखन्याची सोय करण्यात आली. वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद असतो, अशी भावना चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि शीला राज साळवे ट्रस्ट यांच्या वतीने ‘फिरता दवाखाना’ सुरु करण्यात आला आहे. फिरता दवाखाना या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखली मोठ्या संख्येने पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जात.त्यात भक्ती आणि शिस्त असते. आषाढी वारीसाठी निघालेल्या या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे, हे भाग्य असते. वारकर्यांच्या सेवेत विठ्ठल-रुक्मिणीचा आशिर्वाद असतो. त्यामुळे अनेक लहान- मोठ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती आपापल्यापरीने वारकऱ्यांची सेवा करतो.’