बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवून एक कोटींचा अपहार; कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

  41

नाशिक : खोटे दस्तऐवज तयार करून निविदा तयार करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी रुपयांचा अपहार केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जि. प. च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप रतन अहिरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की जिल्हा परिषदेच्या (इवद) विभाग क्रमांक ३ च्या तत्कालीन कार्यकारी अभियंता आरोपी शैलजा नलावडे यांनी इतर इसमांच्या संगनमताने शासन निर्णय क्रमांक टीडीएस २०२४/६/प्र. क्र. १२०/पर्यटन-१ दि. ६ ऑगस्ट २०२४ हा बनावट तयार केला. त्याद्वारे एक कोटी रुपयांची पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासवून हा बनावट शासननिर्णय बेकायदेशीरपणे शासकीय लेखा अहवाल नोंदविला.



खोटे दस्तऐवज तयार करून निविदा भरणाऱ्या इसमांना शासनाच्या एक कोटी रुपयांच्या निधीचा गैरलाभ व्हावा, या उद्देशाने इतर शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी रुपयांच्या निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार


दि. ४ डिसेंबर २०२४ ते ५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या इमारत व दळणवळण विभाग क्रमांक ३ च्या कार्यालयात घडला. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप अहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे व इतरांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्यांना रोखले, तर होणार गुन्हा दाखल

महापालिकेच्या वतीने पाळीव आणि भटक्या प्राण्यांसंदर्भात महापालिकेची मार्गदर्शक तत्त्वे जारी मुंबई (खास

कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ; रायगड ३९२, रत्नागिरी १८१, सिंधुदूर्ग ६३ दरडप्रवण गावे

रायगड : कोकणात दरड प्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली

IPL 2025: RCBच्या विजयी क्षणांनी रचला इतिहास

मुंबई: आयपीएल २०२५मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा खिताब जिंकत अनेक वर्षे जुने स्वप्न पूर्ण केले.

हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका, डोंबिवलीतील शाळांना मनसेचे पत्र

डोंबिवली : देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का?

कच्च्या दुधासह चेहऱ्यावर लावा या ६ गोष्टी, चमकेल तुमची त्वचा

मुंबई: त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी महागडी ब्युटी उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय करणे अधिक फायदेशीर आहे. यातील एक

पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज