भातसा नदीवरील गेरसे पुलाची अवस्था धोकादायक

तातडीने उपाययोजना करण्याची मनसेची मागणी


शहापूर: वासिंद शहरातील कल्याण व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या गेरसे वासिंद रस्त्यातील भातसा नदीवरील जुना गेरसे पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या पुलावरील संरक्षण कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असून, पावसाळ्यात रस्ता ओला आणि निसरडा होत असल्यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे वासिंद शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांजकडे निवेदन देऊन केली आहे.


पावसाळ्यात नागरिक, विद्यार्थी, दुचाकीस्वार, वाहतूक रिक्षा तसेच वृद्ध व्यक्तींना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरावा लागतो. नुकतीच पुणे येथे झालेली इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागाने सजग होणे आवश्यक आहे.


मनसेने आपल्या निवेदनात


१) अवजड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करावी.


२) पुलाचे संरक्षण कठडे तातडीने दुरुस्त करावेत.


३)मंजूर नवीन पुलाच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करावी.


अशा उपाययोजना सुचविल्या आहेत. एवढेच नव्हे तर जर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अमोल बोराडे, शहर सचिव कल्पेश शेलार, शहर उपाध्यक्ष चेतन भोसले, उन्मेश साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

कल्याण : कल्याण शहराच्या (Kalyan) ऐतिहासिक वारशाचा (Heritage) महत्त्वाचा भाग असलेल्या भटाळे तलावाच्या (Bhatale Lake) पुनरुज्जीवन

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)