भातसा नदीवरील गेरसे पुलाची अवस्था धोकादायक

तातडीने उपाययोजना करण्याची मनसेची मागणी


शहापूर: वासिंद शहरातील कल्याण व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या गेरसे वासिंद रस्त्यातील भातसा नदीवरील जुना गेरसे पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या पुलावरील संरक्षण कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असून, पावसाळ्यात रस्ता ओला आणि निसरडा होत असल्यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे वासिंद शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांजकडे निवेदन देऊन केली आहे.


पावसाळ्यात नागरिक, विद्यार्थी, दुचाकीस्वार, वाहतूक रिक्षा तसेच वृद्ध व्यक्तींना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरावा लागतो. नुकतीच पुणे येथे झालेली इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागाने सजग होणे आवश्यक आहे.


मनसेने आपल्या निवेदनात


१) अवजड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करावी.


२) पुलाचे संरक्षण कठडे तातडीने दुरुस्त करावेत.


३)मंजूर नवीन पुलाच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करावी.


अशा उपाययोजना सुचविल्या आहेत. एवढेच नव्हे तर जर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अमोल बोराडे, शहर सचिव कल्पेश शेलार, शहर उपाध्यक्ष चेतन भोसले, उन्मेश साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे