भातसा नदीवरील गेरसे पुलाची अवस्था धोकादायक

तातडीने उपाययोजना करण्याची मनसेची मागणी


शहापूर: वासिंद शहरातील कल्याण व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या गेरसे वासिंद रस्त्यातील भातसा नदीवरील जुना गेरसे पूल सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या पुलावरील संरक्षण कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असून, पावसाळ्यात रस्ता ओला आणि निसरडा होत असल्यामुळे अपघाताची शक्यता प्रचंड वाढली आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी मनसेचे वासिंद शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांजकडे निवेदन देऊन केली आहे.


पावसाळ्यात नागरिक, विद्यार्थी, दुचाकीस्वार, वाहतूक रिक्षा तसेच वृद्ध व्यक्तींना या पुलावरून जाताना जीव मुठीत धरावा लागतो. नुकतीच पुणे येथे झालेली इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित विभागाने सजग होणे आवश्यक आहे.


मनसेने आपल्या निवेदनात


१) अवजड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करावी.


२) पुलाचे संरक्षण कठडे तातडीने दुरुस्त करावेत.


३)मंजूर नवीन पुलाच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करावी.


अशा उपाययोजना सुचविल्या आहेत. एवढेच नव्हे तर जर या गोष्टींकडे दुर्लक्ष करून भविष्यात एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी शहर अध्यक्ष अमोल बोराडे, शहर सचिव कल्पेश शेलार, शहर उपाध्यक्ष चेतन भोसले, उन्मेश साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

ही महादेवाची पवित्र भूमी, इथे 'आय लव्ह महादेव' हीच घोषणा चालेल

मीरा रोड : मीरारोड येथील जेपी नॉर्थ गार्डन सिटीमध्ये नवरात्रीच्या काळात गरबा खेळत असलेल्या महिलांवर धर्मांध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर २०२५ मध्ये होणार सुरू

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन