मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात तरुणीने केली आत्महत्या

मुंबई : साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत २१ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव संध्या पाठक असे आहे. पण संध्याने आत्महत्या केलेली नाही, तिच्या बाबतीत घातपात झाला असावा, असा संशय पाठक कुटुंबाने व्यक्त केला आहे.

संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स (अंकशास्त्र) विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. ती गुरुवार १९ जून २०२५ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली. पण महाविद्यालयाच्या सकाळच्या सत्राची लगबग सुरू असताना संध्याने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिने प्राण सोडले. घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाने पोलिसांना दिली. संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पण पाठक कुटुंबाने वेगळा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. महाविद्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जाणार असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी