मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात तरुणीने केली आत्महत्या

मुंबई : साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत २१ वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव संध्या पाठक असे आहे. पण संध्याने आत्महत्या केलेली नाही, तिच्या बाबतीत घातपात झाला असावा, असा संशय पाठक कुटुंबाने व्यक्त केला आहे.

संध्या पाठक ही साठ्ये महाविद्यालयात स्टॅटिस्टिक्स (अंकशास्त्र) विभागात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. ती गुरुवार १९ जून २०२५ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली. पण महाविद्यालयाच्या सकाळच्या सत्राची लगबग सुरू असताना संध्याने आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. संध्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तिने प्राण सोडले. घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाने पोलिसांना दिली. संध्याने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. पण पाठक कुटुंबाने वेगळा संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेत तपास सुरू केला आहे. महाविद्यालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासले जाणार असल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती