इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या आणले, आर्मेनियाच्या रस्त्याने दिल्लीला पोहोचले

नवी दिल्ली: इराणमध्ये अडकलेले ११० भारतीय विद्यार्थी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. यातील अधिकतर विद्यार्थी हे जम्मू-काश्मीरचे आहेत. हे विद्यार्थी उमिया मेडिकल युनिर्व्हसिटीचे आहेत. विद्यार्थ्यांनी अर्मेनिया आणि दोहाच्या रस्त्याने दिल्लीसाठी उड्डाण केले होते. त्यांचे विमान ३ तास उशिराने पोहोचले.


इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध पाहता भारत सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षित आणण्यासाठी ऑपरेशन सिंधूची सुरूवात केली. सरकारच्या या विशेष ऑपरेशन अंतर्गत १७ जूनला इराणच्या उत्तर भाहात अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. या विद्यार्थ्यांना भारतीच्या दूतावासाच्या देखरेखीखाली रस्ते मार्गाने इराण येथून आर्मेनियाची राजधानी येरेवान येथे पोहोचवण्यात आले. ते या रस्त्याने दिल्लीला आले.



स्पेशल विमानाने दिल्लीला पोहोचले विद्यार्थी


सर्व विद्यार्थी बुधवारी दुपारी २.५५ वाजताच्या स्पेशल फ्लाईटने भारताच्या दिशेने रवाना झाले आणि गुरूवार सकाळी दिल्लीला पोहोचले. भारत सरकारने या अभियानाला सहकार्य दिल्याबद्दल इराण आणि आर्मेनिया सरकारचे विशेष आभार मानले आहेत. यामुळे रेस्क्यू ऑपरेशन सोपे आणि सुरक्षित होण्यास मदत झाली.



अनेक दिवसांपासून सुरू आहे युद्ध


इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने भयंकर रूप घेतले आहे. बुधवारी इस्त्रायलने दावा केला होता की त्यांच्या वायुसेनेने ५० फायटर एअरक्राफ्ट पाठवत इराणवर हल्ला केला.

Comments
Add Comment

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही

१ कोटींचा इनामी माओवादी हिडमा अखेर ठार; सीमेवर भीषण चकमक

छत्तीसगढ : कुख्यात माओवादी कमांडर मडवी हिडमा अखेर सुरक्षा दलांच्या जाळ्यात सापडला. आंध्र प्रदेशातील अल्लुरी

'दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू'

नवी दिल्ली: दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांना पाताळातूनही शोधून काढू आणि कठोर शिक्षा करू, असे केंद्रीय

लिव्ह-इन रिलेशनशिप कधीही स्वीकारणार नाही

सोरममधील सर्वखाप पंचायतीने व्यक्त केली नाराजी  उत्तर प्रदेश  : सोरममधील सर्वखाप पंचायतीने लिव्ह-इन रिलेशनशिप

उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

सर्वसामान्य रुग्णांसाठी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेश  : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी

एसबीआयची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

खातेदारांना शोधावे लागतील नवीन पर्याय नवी दिल्ली  : देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच