BMC Election News: शिवसेना लढणार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीएमसी निवडणूक

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भातील शिवसेनेचे सर्व निर्णय खासदार श्रीकांत शिंदे घेणार!


मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) ऑक्टोबर किंवा त्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. या निवडणुका शिवसेना पक्ष श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढणार आहे अशी माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या तयारीसंदर्भात त्यांनी आज वरळी येथे महत्त्वाची बैठक घेतली. दरम्यान, शुक्रवारी श्रीकांत शिंदे मुंबई महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उबाठा गटाची सत्ता आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून घ्यायचे  एकनाथ शिंदे यांचे लक्ष्य आहे. त्यासाठी शाखाप्रमुखांसह अनेक बदल सर्व ठिकाणी केले जात आहेत, आणि याबद्दल सर्वतोपरी निर्णय श्रीकांत शिंदे घेणार आहे. तर उबाठा गटाचे नेतृत्व हे आदित्य ठाकरे करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदें तयारीला लागले आहेत.  निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी त्याची वाट न पाहता, त्यांनी पक्षातील मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केले आहे. ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकर यांना देण्यात आली आहे, तर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर असेल.  विदर्भ फत्ते करण्याची जबाबदारी संजय राठोड आणि आशिष जैस्वाल यांच्यावर असेल तर मुंबई, नवी मुंबई आणि कोकणसाठी  उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना काम करावे लागणार आहे.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत