BMC Election News: शिवसेना लढणार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीएमसी निवडणूक

  112

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भातील शिवसेनेचे सर्व निर्णय खासदार श्रीकांत शिंदे घेणार!


मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) ऑक्टोबर किंवा त्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. या निवडणुका शिवसेना पक्ष श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढणार आहे अशी माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या तयारीसंदर्भात त्यांनी आज वरळी येथे महत्त्वाची बैठक घेतली. दरम्यान, शुक्रवारी श्रीकांत शिंदे मुंबई महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उबाठा गटाची सत्ता आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून घ्यायचे  एकनाथ शिंदे यांचे लक्ष्य आहे. त्यासाठी शाखाप्रमुखांसह अनेक बदल सर्व ठिकाणी केले जात आहेत, आणि याबद्दल सर्वतोपरी निर्णय श्रीकांत शिंदे घेणार आहे. तर उबाठा गटाचे नेतृत्व हे आदित्य ठाकरे करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदें तयारीला लागले आहेत.  निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी त्याची वाट न पाहता, त्यांनी पक्षातील मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केले आहे. ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकर यांना देण्यात आली आहे, तर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर असेल.  विदर्भ फत्ते करण्याची जबाबदारी संजय राठोड आणि आशिष जैस्वाल यांच्यावर असेल तर मुंबई, नवी मुंबई आणि कोकणसाठी  उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना काम करावे लागणार आहे.

Comments
Add Comment

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी