BMC Election News: शिवसेना लढणार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीएमसी निवडणूक

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भातील शिवसेनेचे सर्व निर्णय खासदार श्रीकांत शिंदे घेणार!


मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) ऑक्टोबर किंवा त्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. या निवडणुका शिवसेना पक्ष श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढणार आहे अशी माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या तयारीसंदर्भात त्यांनी आज वरळी येथे महत्त्वाची बैठक घेतली. दरम्यान, शुक्रवारी श्रीकांत शिंदे मुंबई महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उबाठा गटाची सत्ता आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून घ्यायचे  एकनाथ शिंदे यांचे लक्ष्य आहे. त्यासाठी शाखाप्रमुखांसह अनेक बदल सर्व ठिकाणी केले जात आहेत, आणि याबद्दल सर्वतोपरी निर्णय श्रीकांत शिंदे घेणार आहे. तर उबाठा गटाचे नेतृत्व हे आदित्य ठाकरे करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदें तयारीला लागले आहेत.  निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी त्याची वाट न पाहता, त्यांनी पक्षातील मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केले आहे. ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकर यांना देण्यात आली आहे, तर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर असेल.  विदर्भ फत्ते करण्याची जबाबदारी संजय राठोड आणि आशिष जैस्वाल यांच्यावर असेल तर मुंबई, नवी मुंबई आणि कोकणसाठी  उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना काम करावे लागणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा