BMC Election News: शिवसेना लढणार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीएमसी निवडणूक

  58

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भातील शिवसेनेचे सर्व निर्णय खासदार श्रीकांत शिंदे घेणार!


मुंबई: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (BMC Election) ऑक्टोबर किंवा त्या दरम्यान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. या निवडणुका शिवसेना पक्ष श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात लढणार आहे अशी माहिती शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या तयारीसंदर्भात त्यांनी आज वरळी येथे महत्त्वाची बैठक घेतली. दरम्यान, शुक्रवारी श्रीकांत शिंदे मुंबई महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून उबाठा गटाची सत्ता आहे. त्यामुळे, मुंबई महापालिका कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडे खेचून घ्यायचे  एकनाथ शिंदे यांचे लक्ष्य आहे. त्यासाठी शाखाप्रमुखांसह अनेक बदल सर्व ठिकाणी केले जात आहेत, आणि याबद्दल सर्वतोपरी निर्णय श्रीकांत शिंदे घेणार आहे. तर उबाठा गटाचे नेतृत्व हे आदित्य ठाकरे करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचे वाटप 


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकनाथ शिंदें तयारीला लागले आहेत.  निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी त्याची वाट न पाहता, त्यांनी पक्षातील मंत्र्यांना विभागनिहाय जबाबदारीचं वाटप केले आहे. ज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी शंभूराज देसाई आणि प्रकाश आबिटकर यांना देण्यात आली आहे, तर मराठवाड्याची जबाबदारी संजय शिरसाट यांच्या खांद्यावर असेल.  विदर्भ फत्ते करण्याची जबाबदारी संजय राठोड आणि आशिष जैस्वाल यांच्यावर असेल तर मुंबई, नवी मुंबई आणि कोकणसाठी  उदय सामंत, भरत गोगावले आणि योगेश कदम यांना काम करावे लागणार आहे.

Comments
Add Comment

राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा, मंत्री अतुल सावेंची माहिती

मुंबई : राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे

काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दिसतं नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा भाजपा प्रवेश...

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसचं नेतृत्व दिसत नाही, अशी भूमिका व्यक्त करुन यापूर्वी काँग्रेसच्या

हिंदी भाषेला पर्याय आम्ही दिला आहे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी पत्रकार परिषद घेत पहिली पासून हिंदी भाषा शिकण्यास सक्ती नको. अशी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पवई तलाव भरुन वाहू लागला

मुंबई : आनंदाची बातमी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी पवई तलाव आज म्हणजेच बुधवार १८ जून २०२५ रोजी सकाळी

मध्य रेल्वेवर प्रथम श्रेणी डब्यांमध्ये कारवाई सुरूच

मुंबई : लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये काल सोमवारपासून केंद्र तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात

पूल, साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना मुंबई  : पुण्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी