रानबाजिरे धरणात देवळे धरणातील लालमाती, गाळाचे पाणी

बॅकवॉटरचा जलाशय यंदा होणार उथळ


शैलेश पालकर


पोलादपूर : महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे येथील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये यंदा देवळे धरणाचे लालमाती गाळाचे पाणी वाहून आल्याने यावर्षी बॅकवॉटरचा जलाशय उथळ होणार आहे. यामुळे एमआयडीसीने तातडीने या बॅकवॉटरच्या जलाशयातील गाळाचा उपसा करण्याची गरज निर्माण झाली आहे.


पोलादपूर नजिकच्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. देवळे लघुपाटबंधारे धरण प्रकल्प योजनेच्या दुसऱ्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामाची सुरुवात मार्च १९९७ मध्ये झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १९९८ मध्ये योजनेचे काम बंद केले होते.


साधारणत: २००१ मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे २००३ मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरुवात केली. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतली असता धरणाची गळती सुरू झाली. यानंतर २७ मे २०२४ रोजी आमदार व विद्यमान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने ८७ कोटींचे धरण बांधण्याची घोषणा केली. यंदा पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील धरण मुळापासून उच्चाटन करण्यात आल्याने सावित्री नदीपात्रावरील या धरणाचे अस्तित्वच संपुष्टात आले. या धरणाचा बांध, त्यावरील दगडी पिचिंग, एकमेव लोखंडी दरवाजा, जलाशयातील माती असा सर्वच परिसर यंदा पूर्णपणे गायब झाला आहे.


परिणामी, रानबाजिरे धरण यावर्षीपासून सावित्री नदीपात्रावरील एकमेव धरण ठरले. यंदा रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरच्या जलाशयामध्ये देवळे धरणापासून मोठ्या प्रमाणात लालमाती आणि गाळ वाहून घेणारे सावित्री नदीचे पात्र येऊन सर्व सहा सांडव्यातून मोठ्या प्रमाणात गाळासह पाण्याचा विसर्ग सुरू आहे. देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने धरण बांधण्याची घोषणा केल्यानुसार सद्यस्थितीत देवळे धरण पूर्णपणे गायब झाले असून रानबाजिरे धरण हेच सावित्री नदीवरील पोलादपूर तालुक्यातील एकमेव धरण राहिले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.