रानबाजिरे धरणात देवळे धरणातील लालमाती, गाळाचे पाणी

बॅकवॉटरचा जलाशय यंदा होणार उथळ


शैलेश पालकर


पोलादपूर : महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे येथील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये यंदा देवळे धरणाचे लालमाती गाळाचे पाणी वाहून आल्याने यावर्षी बॅकवॉटरचा जलाशय उथळ होणार आहे. यामुळे एमआयडीसीने तातडीने या बॅकवॉटरच्या जलाशयातील गाळाचा उपसा करण्याची गरज निर्माण झाली आहे.


पोलादपूर नजिकच्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. देवळे लघुपाटबंधारे धरण प्रकल्प योजनेच्या दुसऱ्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामाची सुरुवात मार्च १९९७ मध्ये झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १९९८ मध्ये योजनेचे काम बंद केले होते.


साधारणत: २००१ मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे २००३ मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरुवात केली. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतली असता धरणाची गळती सुरू झाली. यानंतर २७ मे २०२४ रोजी आमदार व विद्यमान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने ८७ कोटींचे धरण बांधण्याची घोषणा केली. यंदा पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील धरण मुळापासून उच्चाटन करण्यात आल्याने सावित्री नदीपात्रावरील या धरणाचे अस्तित्वच संपुष्टात आले. या धरणाचा बांध, त्यावरील दगडी पिचिंग, एकमेव लोखंडी दरवाजा, जलाशयातील माती असा सर्वच परिसर यंदा पूर्णपणे गायब झाला आहे.


परिणामी, रानबाजिरे धरण यावर्षीपासून सावित्री नदीपात्रावरील एकमेव धरण ठरले. यंदा रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरच्या जलाशयामध्ये देवळे धरणापासून मोठ्या प्रमाणात लालमाती आणि गाळ वाहून घेणारे सावित्री नदीचे पात्र येऊन सर्व सहा सांडव्यातून मोठ्या प्रमाणात गाळासह पाण्याचा विसर्ग सुरू आहे. देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने धरण बांधण्याची घोषणा केल्यानुसार सद्यस्थितीत देवळे धरण पूर्णपणे गायब झाले असून रानबाजिरे धरण हेच सावित्री नदीवरील पोलादपूर तालुक्यातील एकमेव धरण राहिले आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; तिघे जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

रायगड : माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघे जखमी झाले असून दोन्ही

रायगड जिल्ह्यात १५ दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट

जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही रायगड: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या

पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना

मतदानकरून परत येताना महाडमध्ये दरीत कोसळली कार; चौघेजण....

महाड : नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूकमही पार पडली आहे. आणि आजच त्याचे निकालही लागले आहेत. त्यामुळे मतदानासाठी

अर्थसंकल्पातून कोकणच्या आर्थिक विकासाला नवी दिशा

काजू, नारळ, मत्स्योद्योगाला भरीव निधी सुभाष म्हात्रे अलिबाग : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी