रानबाजिरे धरणात देवळे धरणातील लालमाती, गाळाचे पाणी

बॅकवॉटरचा जलाशय यंदा होणार उथळ


शैलेश पालकर


पोलादपूर : महाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे येथील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये यंदा देवळे धरणाचे लालमाती गाळाचे पाणी वाहून आल्याने यावर्षी बॅकवॉटरचा जलाशय उथळ होणार आहे. यामुळे एमआयडीसीने तातडीने या बॅकवॉटरच्या जलाशयातील गाळाचा उपसा करण्याची गरज निर्माण झाली आहे.


पोलादपूर नजिकच्या कापडे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे या महाड एमआयडीसीसाठी बांधण्यात आलेल्या धरणाचे स्वरूप चिरेबंदी दगडी बांधकाम आणि सांडव्यांच्या भागास काँक्रीटचे अस्तरीकरण तर स्टेलिंग बेसिसच्या भागात सांडव्यांतून येणारे पाणी साठविण्यासाठी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. देवळे लघुपाटबंधारे धरण प्रकल्प योजनेच्या दुसऱ्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये कामाची सुरुवात मार्च १९९७ मध्ये झाली. मात्र, बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना भूसंपादनाची रक्कम न मिळाल्याने तसेच भूसंपादनात जमिनीचा दर कमी लावल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी १९९८ मध्ये योजनेचे काम बंद केले होते.


साधारणत: २००१ मध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात भूसंपादनाचा मोबदला अदा केल्यानंतर मे २००३ मध्ये योजनेचे घळभरणीचे काम पूर्ण करून पाणीसाठा करण्यास सुरुवात केली. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर देवळे लघुपाटबंधारे योजनेच्या या धरणात पाणीसाठा होत असल्याची चाचणी घेतली असता धरणाची गळती सुरू झाली. यानंतर २७ मे २०२४ रोजी आमदार व विद्यमान मंत्री भरतशेठ गोगावले यांनी देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने ८७ कोटींचे धरण बांधण्याची घोषणा केली. यंदा पोलादपूर तालुक्यातील देवळे येथील धरण मुळापासून उच्चाटन करण्यात आल्याने सावित्री नदीपात्रावरील या धरणाचे अस्तित्वच संपुष्टात आले. या धरणाचा बांध, त्यावरील दगडी पिचिंग, एकमेव लोखंडी दरवाजा, जलाशयातील माती असा सर्वच परिसर यंदा पूर्णपणे गायब झाला आहे.


परिणामी, रानबाजिरे धरण यावर्षीपासून सावित्री नदीपात्रावरील एकमेव धरण ठरले. यंदा रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरच्या जलाशयामध्ये देवळे धरणापासून मोठ्या प्रमाणात लालमाती आणि गाळ वाहून घेणारे सावित्री नदीचे पात्र येऊन सर्व सहा सांडव्यातून मोठ्या प्रमाणात गाळासह पाण्याचा विसर्ग सुरू आहे. देवळे धरण मुळापासून उकरून नव्याने धरण बांधण्याची घोषणा केल्यानुसार सद्यस्थितीत देवळे धरण पूर्णपणे गायब झाले असून रानबाजिरे धरण हेच सावित्री नदीवरील पोलादपूर तालुक्यातील एकमेव धरण राहिले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग