मेट्रो लाईन १ वर क्यूआर तिकीट प्रणाली सुरू

  41

प्रवाशांसाठी सुरळीत प्रवासाचा अनुभव


नवी मुंबई  : कॉमन मोबिलिटी सोल्युशनच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, सिडकोने नवी मुंबई मेट्रो लाईन १ वर कालपासून पेपर क्यूआर तिकीट प्रणाली यशस्वीपणे सुरू केली आहे. ही नावीन्यपूर्ण तिकीट प्रणाली ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणालीचे अद्ययावतीकरण करून साकारण्यात आली आहे, जे नव्या गरजांना पूरक आहे. या प्रणालीचे उद्घाटन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक, शान्तनु गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संतोष ओंभासे, अधिक्षक अभियंता, सिडको, मिलींद रावराणे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनेन्स), हरीश गुप्ता, कार्यकारी संचालक, महामेट्रो व अन्य अधिकारी उपस्थित होते.


क्यूआर आधारित तिकीट प्रणालीची आज बेलापूर मेट्रो स्थानकावर अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांना जलद, सुलभ व सुरळीत प्रवास अनुभव प्रदान करणे हा आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी सिडकोतर्फे भविष्यात लवकरच आणखीन काही नवीन सुविधा देखील समाविष्ट केल्या जाणार आहेत. यामध्ये मोबाईल तिकीटिंग अ‍ॅपचा समावेश आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून भविष्यात प्रवाशांना मेट्रोची तिकीटे खरेदी करता येतील.


आगामी व्हॉट्सॲप आधारित तिकीट सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना थेट व्हॉट्सॲपद्वारे तिकीटे खरेदी करता येतील. तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) च्या माध्यमातून भविष्यात एकसंध पेमेंट सोल्युशन अंतर्गत विविध वाहतूक सेवा एकत्रितपणे वापरता येऊ शकतील. या सर्व सुविधा लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. ही क्यू आर आधारित तिकीट प्रणाली मेसर्स औरियन प्रो सोल्युशन्स प्रा. लि. यांनी तयार केली असून, सिडको आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यास सिडको कटीबद्ध असून क्यू आर आधारित तिकीट प्रणालीचा प्रारंभ हे त्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी