पावसाळी अपघात टाळण्यासाठी रायगड पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

रायगड: माणगाव तालुक्यात पावसाळी पर्यटनस्थळांवर वाढत्या अपघातांची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाद्वारे पर्यटकांसाठी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. ज्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पावसाळ्यात सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण असलेले देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हीणी घाट परिसरासह रायगड येथील इतर प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.


पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार पर्यटकांनी धबधब्यांच्या परिसरात दारूचे सेवन करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा रिल्स बनवणे, उधळपट्टी करणे अशा कृतींना पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.



सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक


पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य अनुभवताना सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून, पर्यटकांनी नियमांचे पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा

थ्री इडियट्सचा सिक्वेल २०२६ मध्ये येणार, सिनेप्रेमींची वाढली उत्सुकता

मुंबई : तब्बल १५ वर्षांनंतर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘थ्री