पावसाळी अपघात टाळण्यासाठी रायगड पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

रायगड: माणगाव तालुक्यात पावसाळी पर्यटनस्थळांवर वाढत्या अपघातांची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाद्वारे पर्यटकांसाठी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे. ज्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पावसाळ्यात सर्वात जास्त गर्दीचे ठिकाण असलेले देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉइंट, ताम्हीणी घाट परिसरासह रायगड येथील इतर प्रसिद्ध पावसाळी पर्यटनस्थळांचा समावेश आहे.


पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रांताधिकारी संदीपान सानप यांनी काही प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशांनुसार पर्यटकांनी धबधब्यांच्या परिसरात दारूचे सेवन करणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा रिल्स बनवणे, उधळपट्टी करणे अशा कृतींना पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.



सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक


पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य अनुभवताना सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या असून, पर्यटकांनी नियमांचे पालन करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

इंदुरीकर महाराज झाले नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी

मुंबई : आपल्या खास शैलीत कीर्तन आणि समाजप्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या

मुंबईच्या राम मंदिर स्टेशनवर जन्मलेले बाळ झाले 'नैसर्गिकरित्या बरे'.

मुंबई : राम मंदिर स्टेशनवर जन्मलेल्या बाळाची तब्येत जन्मानंतर काही तासांत खालावली होती. पण वेळेत उपचार

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांच्या न्यायाची हमी

मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद

क्विक हीलने टोटल सिक्‍युरिटी व्‍हर्जन२६ लाँच सायबर क्राईमपासून आता संपूर्ण मुक्ती मिळणार

मुंबई: क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

चित्रपती डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : अयोध्येचा राजा, माणूस, कुंकू, झनक झनक पायल बाजे, डॉ. कोटनीस की अमर कहानी, दो आँखे बारा हाथ, नवरंग, पिंजरा’