Jarann movie box office collection 2nd week : फुल ढिंचॅक माऊथ पब्लिसिटी! ‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी

मुंबई : वर्ड ऑफ माऊथ, दमदार अभिनय, वास्तवाशी नाते सांगणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर ‘जारण’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘जारण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवत आहे. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ १२ दिवसांत तब्बल ३.५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल १.६५ कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.


अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या सशक्त अभिनयाने या कथेला भावनिक उंची मिळाली असून, त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर दोघींच्या अभिनयाची आणि चित्रपटाच्या कथेची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीमुळे चित्रपटगृहात शोज वाढवले जात आहेत आणि प्रत्येक शोमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. कथानकातील सत्यता, भावनांची खोली, आणि उत्तम सादरीकरण यामुळे चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे.



चित्रपटाच्या यशाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, ‘जारण’ सारखा संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर सादर केला, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला याचा खूप आनंद होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक, समीक्षक आणि इंडस्ट्रीतील दिग्गजांनी कथा आणि सादरीकरणाचं कौतुक केलं, हे एखाद्या दिग्दर्शकासाठी अत्यंत समाधानकारक आहे. प्रत्येक प्रतिक्रिया, प्रत्येक शाबासकी आम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा देते.” निर्माते अमोल भगत म्हणतात, “चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद पाहून मन भरून येते. थिएटर्समध्ये वाढणारे शो, बॉक्स ऑफिसवर वाढती आकडेवारी, आणि सोशल मीडियावरचा सकारात्मक प्रतिसाद हे सर्व पाहाता खरच खूप आनंद होतो. हे यश आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचे आहे.“


अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’चे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून

The Lalla Anthem: अनिल कपूर आणि हरभजन सिंह यांचा दमदार संदेश – इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर परिणाम भोगावे लागतील!

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू

एडिट केलेलं फुटेज जाहीर करा’; ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांना दिव्या शिंदेचा कायदेशीर इशारा

मुंबई : बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत कायदेशीर

Rajpal Yadav's Brother Statement: अभिनेता राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे; काय म्हणाले श्रीपाल यादव?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नऊ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ५

नव्या आकर्षक पोस्टरसह ‘द पॅराडाईज’ची घोषणा

मुंबई : २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून द पॅराडाईजची ओळख निर्माण झाली आहे. चित्रपटाची