Indian Economy: जागतिक आर्थिक संकटातही भारताने चांगला विकास दर राखला - मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेस्वरन

प्रतिनिधी: जगभरात प्रतिकूल परिस्थिती असतानाही भारताने चांगला विकास दर राखला आहे असे प्रतिपादन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंथा नागेस्वरन यांनी केले आहे. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 'सध्याच्या संकटाच्या काळातही भारत चांगल्या प्रकारे मार्गेक्रमण करत आहे. जागतिक स्थिती अस्थिरत असतानाही आपण चांगली कामगिरी करत आहोत. राजकीय व आर्थिक स्थिती पाहता विकास दर वाढीसाठी अनुकूल नाही. अजूनही अस्थिरता कायम आहे त्यामुळे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकीला तत्काळ स्थगिती देऊ शकतात 'असे त्यांनी यापुढे म्हटले आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.


जागतिक बँकेच्या अहवालावर बोलताना ते म्हणाले की, ' सध्या आताच सांगणे कठीण आहे की आताची परिस्थिती २००८ आर्थिक मंदीसारखी आहे का? मला नाही वाटत २००९ सारखी जागतिक मंदी पातळी आता आहे.गेल्या ७ वर्षातला विकास दरवृद्धीसाठी हा संथ काळ आहे. काही विशिष्ट बाबतीत २००८ वैश्विक मंदीपेक्षा प्रतिकूल प्रभाव असू शकतो मात्र हा पुढेही पसारू शकतो.'


यापुढे त्यांनी म्हटले होते की, सध्याची एकत्रित परिस्थिती पाहता,भारतीय अर्थव्यवस्थेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ६.५% विकासदर कायय राखला आहे व आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा दर ६.३ ते ६.८% पातळीवर राहू शकतो असा आमचा अंदाज आहे.'


जागतिक व्यापार (Trading) परिस्थितीवर सकारात्मक भाष्य करताना नागेस्वर न म्हणाले, ' आपली जागतिक मुत्सद्दीपणा, पेट्रोलियम मंत्रालय, पंतप्रधान मोदींचे प्रयत्न, परराष्ट्र मंत्रालय यांच्या एकत्रित परिणाम म्हणून निश्चित आहे की भारतीय उर्जा क्षेत्रात पुरवठा प्रभावित होणार नाही. आपली जगभरातील प्रतिमा आश्वासक असल्याने आपण उत्तम मध्यस्थ (Mediator) आहोत. त्यामुळे प्रत्येक जगातील देशाला भारताच्या प्रतिष्ठेशी संलग्न व्हायचे आहे.'


आर्थिक स्थितीवर बोलताना ते पुढे म्हणाले,' व्यापाऱ्यांच्या घडामोडी बघताना भारत आयात शुल्क कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे जेणेकरून घरगुती उत्पादनाच्या किंमतीही नियंत्रणात राहतील. जागतिक परिस्थितीचा फायदा घेताना आपल्या देशात शिक्षण, कौशल्य विकास,खनिज उत्पादन यावर गुंतवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.भारताचे उत्पादन,सेवा क्षेत्रातील प्राथमिक अस्तित्व आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे' असे त्यांनी म्हटले.


दरम्यान नुकताच जागतिक बँकेचा अहवाल प्रदर्शित झाला होता ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकीय आर्थिक स्थितीबाबत व्यक्त होताना जागतिक अर्थव्यवस्थेवरही विस्तृत भाष्य केले होते. अहवालात म्हटल्याप्रमाणे, यंदा २००८ साली उद्भवलेल्या जागतिक मंदीची नांदी दिसून येते. त्यावर भाष्य करताना भारताचे मुख्य आर्थिक वर्ष संपल्यानंतर व्ही अनंथ नागेस्वरन यांनी भारताची जागतिक संकटाच्या काळातही होणारी आर्थिक प्रगती ठळकपणे मांडली.

Comments
Add Comment

Upcoming Stock Bonus Issue: बोनस शेअर मिळवण्याची गुंतवणूकदारांना आयती संधी....आज १ व उद्या ४ कंपनीची Record Date निश्चित! जाणून घ्या यादी

प्रतिनिधी: आज नव्या कॉर्पोरेट अँक्शन प्रकाशधोतात असणार आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आज १ व

Stock Market Update: फार्मा,आयटी, हेल्थकेअर शेअर्समुळे शेअर बाजारात तेजी 'हे' देशांतर्गत कारण वाढीस कारणीभूत

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात किरकोळ वाढ झाली आहे. पहाटे गिफ्ट निफ्टीतील किरकोळ

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पंतप्रधान मोदींचा मुंबईत जोरदार 'प्रहार'! 'नाव न घेता' उद्धव ठाकरेंना दिला मोठा 'झटका'

मेट्रो प्रकल्प रोखला; मुंबई हल्ल्यावरून काँग्रेसवरही केला घणाघात नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या

Gold Silver Rate Today: सोने सलग तिसऱ्यांदा नव्या उच्चांकावर! आकडे पाहून कापरे भरणार? सोने १२३००० पार, चांदीतही पराकोटीची वाढ

मोहित सोमण: एकीकडे मजबूत जागतिक फंडामेंटल व दुसरीकडे आर्थिक अस्थिरता या दोन कारणांमुळे कमोडिटीतील दबाव आणखी