Monsoon Hair Care : पावसामुळे केस झालेत राठ? केसांची ‘अशी’ घ्या काळजी...

ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूंमध्ये केसांची काळजी घ्यावीच लागते. पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित समस्या वाढतात. यासोबतच केस खडबडीत होण्याची आणि गळण्याची समस्याही वाढू लागते. पावसात भिजल्याने टाळूमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका देखील जास्त प्रमाणात असतो. अनेकांना पावसाळ्यात केसगळतीचा त्रास होतो. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी, त्यांची योग्य निगा राखणे आवश्यक असते. या पावसाळ्यात अनेकजणींना केसांच्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात केस गळणे आणि तुटण्याची समस्या अधिक वाढते. केस ड्राय, रखरखीत, दिवसाआड चिकट होणे अशा समस्याही वाढू लागतात. कोंडा ही देखील या ऋतूतील सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी हे पाहूयात आजच्या या लेखातून.



१. पावसाच्या पाण्यापासून केसांचे संरक्षण करा


पावसाळ्यात बाहेर येता - जाता आपले केस भिजतात, केस भिजल्यामुळे अधिक तुटतात. हे टाळायचे असल्यास केस पावसात भिजल्यावर घरी आल्यानंतर लगेच कोमट पाण्याने केस धुवावेत. केसांना शाम्पू लावून २ ते ५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. थोड्यावेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवा, असे केल्याने केसांमधील घाण पूर्णपणे साफ होईल.



२. तेलाने मसाज करा


शाम्पूच्या १५ मिनिटे आधी खोबरेल तेल लावल्याने केस प्री - कंडिशनिंग होण्यास मदत होते. त्यामुळे स्कॅल्पचा कोरडेपणाही कमी होतो.



३. संसर्ग टाळा


पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी केस आणि स्कॅल्पसाठी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करावा जे संक्रमणापासून केसांचे संरक्षण करु शकतील. कोरफड, मेथी आणि आवळा यांसारख्या गोष्टी पावसाळ्यात संसर्गापासून केसांचे संरक्षण करतात. आपला कंगवा कोणाशीही शेअर करू नका, यामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.




४. केशरचनेची काळजी


पावसाच्या पाण्यांत भिजून केस ओले होऊ नयेत म्हणून हाय पोनीटेल किंवा बन अशा हेअर स्टाईल करा. यामुळे तुमचे केस गळण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर स्कॅल्पला खाज येणे आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यास मदत होईल.




५. योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा


पावसाळ्यात आपले केस अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. वातावरणातील अधिक आर्द्रतेमुळे केसांची चमक आणि व्हॉल्युम कमी होते. अशावेळी केसांना सूट होईल असा शॅम्पू आणि कंडिशनर निवडा. शाम्पूनंतर कंडिशनर लावा आणि ओल्या केसांवर चांगले हेअर सीरम वापरा यामुळे तुमचे कसे फ्रिजी होणार नाहीत.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल