Monsoon Hair Care : पावसामुळे केस झालेत राठ? केसांची ‘अशी’ घ्या काळजी...

ऋतू कोणताही असो, प्रत्येक ऋतूंमध्ये केसांची काळजी घ्यावीच लागते. पावसाळ्यात आरोग्याशी संबंधित समस्या वाढतात. यासोबतच केस खडबडीत होण्याची आणि गळण्याची समस्याही वाढू लागते. पावसात भिजल्याने टाळूमध्ये बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका देखील जास्त प्रमाणात असतो. अनेकांना पावसाळ्यात केसगळतीचा त्रास होतो. केसांचे सौंदर्य टिकवण्यासाठी, त्यांची योग्य निगा राखणे आवश्यक असते. या पावसाळ्यात अनेकजणींना केसांच्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात केस गळणे आणि तुटण्याची समस्या अधिक वाढते. केस ड्राय, रखरखीत, दिवसाआड चिकट होणे अशा समस्याही वाढू लागतात. कोंडा ही देखील या ऋतूतील सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत, पावसाळ्यात तुम्हाला तुमच्या केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी हे पाहूयात आजच्या या लेखातून.



१. पावसाच्या पाण्यापासून केसांचे संरक्षण करा


पावसाळ्यात बाहेर येता - जाता आपले केस भिजतात, केस भिजल्यामुळे अधिक तुटतात. हे टाळायचे असल्यास केस पावसात भिजल्यावर घरी आल्यानंतर लगेच कोमट पाण्याने केस धुवावेत. केसांना शाम्पू लावून २ ते ५ मिनिटे तसेच राहू द्या, नंतर बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. थोड्यावेळाने केस पाण्याने स्वच्छ धुवा, असे केल्याने केसांमधील घाण पूर्णपणे साफ होईल.



२. तेलाने मसाज करा


शाम्पूच्या १५ मिनिटे आधी खोबरेल तेल लावल्याने केस प्री - कंडिशनिंग होण्यास मदत होते. त्यामुळे स्कॅल्पचा कोरडेपणाही कमी होतो.



३. संसर्ग टाळा


पावसाळ्यात बुरशीजन्य संसर्गापासून मुक्त राहण्यासाठी केस आणि स्कॅल्पसाठी अशा नैसर्गिक घटकांचा वापर करावा जे संक्रमणापासून केसांचे संरक्षण करु शकतील. कोरफड, मेथी आणि आवळा यांसारख्या गोष्टी पावसाळ्यात संसर्गापासून केसांचे संरक्षण करतात. आपला कंगवा कोणाशीही शेअर करू नका, यामुळे संसर्गाचा धोकाही वाढतो.




४. केशरचनेची काळजी


पावसाच्या पाण्यांत भिजून केस ओले होऊ नयेत म्हणून हाय पोनीटेल किंवा बन अशा हेअर स्टाईल करा. यामुळे तुमचे केस गळण्याचे प्रमाण कमी होईल. त्याचबरोबर स्कॅल्पला खाज येणे आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यास मदत होईल.




५. योग्य शॅम्पू आणि कंडिशनर निवडा


पावसाळ्यात आपले केस अधिक कोरडे आणि निर्जीव होतात. वातावरणातील अधिक आर्द्रतेमुळे केसांची चमक आणि व्हॉल्युम कमी होते. अशावेळी केसांना सूट होईल असा शॅम्पू आणि कंडिशनर निवडा. शाम्पूनंतर कंडिशनर लावा आणि ओल्या केसांवर चांगले हेअर सीरम वापरा यामुळे तुमचे कसे फ्रिजी होणार नाहीत.

Comments
Add Comment

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी