मध्य रेल्वेवर प्रथम श्रेणी डब्यांमध्ये कारवाई सुरूच

मुंबई : लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये काल सोमवारपासून केंद्र तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी १७१ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला तर आज दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच होती. आज सकाळच्या वेळेस १४९ प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली व त्यांच्याकडून २६ हजार ७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने काल सोमवारपासून विशेष तिकीट तपासणी पथक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी सर्वप्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात केले होते .


आजही सकाळी रेल्वेच्या नऊ गाड्यांमध्ये मध्य रेल्वे , हार्बर रेल्वे व ट्रान्स हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर एकूण १४९ प्रवाशांना पकडण्यात आले त्यात ५८ रेल्वे कर्मचारी , ९ आरपीएफ पोलीस व ८२ इतर प्रवासी होते . त्यांच्याकडून रेल्वेने तात्काळ २६ हजार ७० रुपयांचा दंड वसूल केला . ही कारवाई सकाळी गर्दीच्या वेळेस एकूण नऊ गाड्यांमध्ये अंबरनाथ - दादर, टिटवाळा- दादर, बदलापूर - दादर , ठाणे - पनवेल व पनवेल - कुर्ला यादरम्यान करण्यात आली. सर्वाधिक प्रवाशांवर कारवाई ही ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर करण्यात आली. तेथून एकूण ९ रेल्वे कर्मचारी एक आरपीएफ पोलीस व २२ इतर प्रवासी यांच्याकडून एकूण ६ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सायंकाळी ही गर्दीच्या वेळेस एकूण आठ रेल्वेच्या डब्यात ही कारवाई करण्यात येणार असून ही कारवाई पुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला