मध्य रेल्वेवर प्रथम श्रेणी डब्यांमध्ये कारवाई सुरूच

मुंबई : लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये काल सोमवारपासून केंद्र तिकीट तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सोमवारी १७१ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला तर आज दुसऱ्या दिवशीही ही कारवाई सुरूच होती. आज सकाळच्या वेळेस १४९ प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली व त्यांच्याकडून २६ हजार ७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


प्रथम श्रेणी डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या तक्रारी सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने काल सोमवारपासून विशेष तिकीट तपासणी पथक आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी सर्वप्रथम श्रेणी डब्यांमध्ये टप्प्याटप्प्याने व संपूर्ण प्रवासादरम्यान तैनात केले होते .


आजही सकाळी रेल्वेच्या नऊ गाड्यांमध्ये मध्य रेल्वे , हार्बर रेल्वे व ट्रान्स हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवर एकूण १४९ प्रवाशांना पकडण्यात आले त्यात ५८ रेल्वे कर्मचारी , ९ आरपीएफ पोलीस व ८२ इतर प्रवासी होते . त्यांच्याकडून रेल्वेने तात्काळ २६ हजार ७० रुपयांचा दंड वसूल केला . ही कारवाई सकाळी गर्दीच्या वेळेस एकूण नऊ गाड्यांमध्ये अंबरनाथ - दादर, टिटवाळा- दादर, बदलापूर - दादर , ठाणे - पनवेल व पनवेल - कुर्ला यादरम्यान करण्यात आली. सर्वाधिक प्रवाशांवर कारवाई ही ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर करण्यात आली. तेथून एकूण ९ रेल्वे कर्मचारी एक आरपीएफ पोलीस व २२ इतर प्रवासी यांच्याकडून एकूण ६ हजार ८१० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सायंकाळी ही गर्दीच्या वेळेस एकूण आठ रेल्वेच्या डब्यात ही कारवाई करण्यात येणार असून ही कारवाई पुढेही अशीच सुरु राहणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.