Meghalay Murder Case: राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे सोनमचा एन्काउंटर करण्याची मागणी

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) हिनेच केल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास मेघालय पोलिस करत असून, आज दि. १७ जून रोजी मेघालय पोलिसांनी राजाची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना घटनास्थळी आणले होते. यादरम्यान, दिनांक २३ मे रोजी राजाच्या हत्येचा सीन पुन्हा एकदा तयार करण्यात आला,  त्या दिवशी फक्त १८ मिनिटांत राजा रघुवंशीची हत्या कशी झाली? हे यामुळे उघड झाले. राजा रघुवंशीचे दोन्ही भाऊ मेघालय पोलिसांच्या तपासावर समाधानी दिसत आहेत. आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी राजाचा छोटा भाऊ सचिन रघुवंशीने सोनमला जन्मठेपेची मागणी केली आहे, तर मोठा भाऊ विपिनने सोनम रघुवंशीचा एन्काउंटर करा असे म्हंटले आहे.


मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आरोपी सोनमला आज(दि.१७) घटनास्थळी नेले, तिच्यासोबत इतर आरोपी देखील होते. यावर राजा रघुवंशीचा भाऊ विपिन म्हणाला की, मेघालय पोलिस राजाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगले काम करत आहेत. जर मी सोनमसमोर आलो तर मी तिला विचारेन की तिने राजाला का मारले. मेघालय पोलिस गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहेत, त्यामुळे तपास चांगला चालला आहे. आम्ही या तपासावर खूश आहोत. यावेळी सोनमच्या एन्काउंटरची त्याने मागणी केली. 'हे लोक आता तुरुंगात जातील, नंतर त्यांना पॅरोलवर सोडले जाईल, एन्काउंटर करणे चांगले, त्यांना लगेच संपवा', अशी मागणी त्याने केली.


यावेळी सचिन रघुवंशी म्हणाले की, मी मनापासून म्हणतो की मेघालय पोलिस राजा हत्याकांडाचा तपास खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. आज सोनममुळे मेघालयची बदनामी झाली आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तिला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. सोनमला मरेपर्यंत तुरुंगात ठेवले पाहिजे. दरम्यान, आज पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणले होते. हत्येच्या कटात पत्नी सोनम सहभागी असल्याचे यात निष्पन्न झाले.

Comments
Add Comment

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

चेहऱ्याची त्वचा नितळ ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स!

आपल्या शरीरात जेव्हा एखादा बदल होतो, तेव्हा त्याचा परिणाम लगेच आपल्या चेहऱ्यावर दिसतो. जसे की, आपण अतिउष्ण