Meghalay Murder Case: राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे सोनमचा एन्काउंटर करण्याची मागणी

  37

इंदूर: राजा रघुवंशीची हत्या (Raja Raghuvanshi Murder) पत्नी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) हिनेच केल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास मेघालय पोलिस करत असून, आज दि. १७ जून रोजी मेघालय पोलिसांनी राजाची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना घटनास्थळी आणले होते. यादरम्यान, दिनांक २३ मे रोजी राजाच्या हत्येचा सीन पुन्हा एकदा तयार करण्यात आला,  त्या दिवशी फक्त १८ मिनिटांत राजा रघुवंशीची हत्या कशी झाली? हे यामुळे उघड झाले. राजा रघुवंशीचे दोन्ही भाऊ मेघालय पोलिसांच्या तपासावर समाधानी दिसत आहेत. आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी राजाचा छोटा भाऊ सचिन रघुवंशीने सोनमला जन्मठेपेची मागणी केली आहे, तर मोठा भाऊ विपिनने सोनम रघुवंशीचा एन्काउंटर करा असे म्हंटले आहे.


मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आरोपी सोनमला आज(दि.१७) घटनास्थळी नेले, तिच्यासोबत इतर आरोपी देखील होते. यावर राजा रघुवंशीचा भाऊ विपिन म्हणाला की, मेघालय पोलिस राजाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगले काम करत आहेत. जर मी सोनमसमोर आलो तर मी तिला विचारेन की तिने राजाला का मारले. मेघालय पोलिस गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहेत, त्यामुळे तपास चांगला चालला आहे. आम्ही या तपासावर खूश आहोत. यावेळी सोनमच्या एन्काउंटरची त्याने मागणी केली. 'हे लोक आता तुरुंगात जातील, नंतर त्यांना पॅरोलवर सोडले जाईल, एन्काउंटर करणे चांगले, त्यांना लगेच संपवा', अशी मागणी त्याने केली.


यावेळी सचिन रघुवंशी म्हणाले की, मी मनापासून म्हणतो की मेघालय पोलिस राजा हत्याकांडाचा तपास खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. आज सोनममुळे मेघालयची बदनामी झाली आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तिला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. सोनमला मरेपर्यंत तुरुंगात ठेवले पाहिजे. दरम्यान, आज पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणले होते. हत्येच्या कटात पत्नी सोनम सहभागी असल्याचे यात निष्पन्न झाले.

Comments
Add Comment

देशभरात ६८३६ कोरोनाचे रुग्ण सक्रिय

नवी दिल्ली : देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या ६८३६ वर आली आहे. गेल्या ६ दिवसांत सक्रिय रुग्णांमध्ये २८५ ने घट

Gangster Couple: ऐकावं ते नवलच! गँगस्टर काला जठेडी तुरुंगात राहून बनणार बाबा, आयव्हीएफ ट्रीटमेंटद्वारे बाळ जन्माला घालणार

गेल्यावर्षी अनुराधा चौधरी उर्फ 'रिव्हॉल्व्हर राणी'  सोबत केले लग्न,  आता हे गँगस्टर दाम्पत्य दूर राहून वंश

राजुरीत एसटी बसेसकडून नियमांचे उल्लंघन

बसस्थानकावर एसटी थांबत नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय पुणे : राजुरी (ता.जुन्नर) येथील बसस्थानकावर लांब

म्हाळुंगी नदीवरील पूल जनतेच्या सेवेसाठी खुला

नागरिकांची गैरसोय दूर संगमनेर : शहरातील अत्यंत महत्त्वाचा असणारा स्वामी समर्थ नगर ते संतोषी माता मंदिर

भारताचा कसोटी कर्णधार न होण्याबाबत जसप्रीत बुमराहने सोडले मौन

लंडन:  जसप्रीत बुमराहने अखेर भारताच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल आपले मौन सोडले आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित

परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने अखेर सोडल मौन

मुंबई : अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिकडीने 'हेरा फेरी' सिनेमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.आता