पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावासाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. जूनच्या सुरवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे शनिवारी काही भागात पावसाचा जोर वाढला.

मुंबईतही रविवारी आणि सोमवारी पावसाने झोडपून काढले. सध्या हवामानात बदल झाल्याने काही ठिकाणी जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील कोकणातील काही भागात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यासहीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर, या भागातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या भागतही हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाचा काही भागात अंदाज व्यक्त केल्याने काही धरणात क्यूसेक 2500 पाण्याचा साठा आहे. त्यामुळे जोरदार पावसाच्या आगमनामुळे धरणाचा क्यूसेक वाढू शकतो.
Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर