पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...

  94

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावासाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. जूनच्या सुरवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे शनिवारी काही भागात पावसाचा जोर वाढला.

मुंबईतही रविवारी आणि सोमवारी पावसाने झोडपून काढले. सध्या हवामानात बदल झाल्याने काही ठिकाणी जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील कोकणातील काही भागात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यासहीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे, सातारा, कोल्हापूर, या भागातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर या भागतही हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाचा काही भागात अंदाज व्यक्त केल्याने काही धरणात क्यूसेक 2500 पाण्याचा साठा आहे. त्यामुळे जोरदार पावसाच्या आगमनामुळे धरणाचा क्यूसेक वाढू शकतो.
Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’