पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडले जाणार, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पुणे:  तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर (Kundmala Bridge Collapses), पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिल्या असून,  या संदर्भातली बैठक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.


मावळ येथील इंदुरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल रविवारी कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे जिल्ह्यातील गावं आणि वस्त्यांना जोडणाऱ्या सर्व जुन्या लोखंडी पादचारी पूलांची अवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण, जिल्ह्यात असे अनेक लोखंडी पूल आहेत, जे धोकादायक स्थितीत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढे देखील अशी घटना घडण्याचा संभव अधिक असल्यामुळे, हे सर्व धोकादायक पूल पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.


पुणे शहरापासून काही अंतरावर असलेले शांत आणि जास्त वर्दळ नसलेले स्थळ म्हणून कुंडमळा ओळखले जाते. इंद्रायणी नदी आणि कुंडराई देवीचे मंदिर तसेच नजीक असलेले छोटेसे धरण यामुळे कुंडमळाचा निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो. त्यात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याकारणामुळे शे-दोनशे पर्यटकांनी  या ठिकाणी गर्दी केली होती. दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला.



एकाच वेळी 100 ते 150 पर्यटक पुलावर आल्याने पूल कोसळला


एरव्ही शांतता आणि कमी वर्दळ असलेल्या या ठिकाणी रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. १०० ते १५० पर्यटक पुलावर उभे होते. फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी पुलावर एकच गर्दी केली होती. त्याचवेळी इंद्रायणी नदीचा प्रवाह देखील प्रचंड होता, शिवाय पूल देखील ३० वर्ष जुना गंजलेल्या अवस्थेमध्ये होता. त्यामुळे, पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल मधोमध तुटून कोसळला. ज्यामध्ये अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, तर काही पूलाखाली अडकून पडले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जणांना वाचवण्यात यश आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत NDRF व स्थानिक बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू होते. सोमवारी सकाळपासून ड्रोनच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्यांचा शोध घेतला गेला.


Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; १५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) हळूहळू सक्रिय होत असून गुरुवारी (१२ जून) अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि

Chandrashekar Bawankule : गगनचुंबी टॉवर व झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर

 महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा; मुंबईत 'मायक्रो झोनिंग' सर्वेक्षण सुरू मुंबई : एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि

सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी

Agriculture Minister Dattatreya Bharne : वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

मुंबई : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या

Maharashtra Kesari Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात!’ गाडीचा चक्काचूर; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचाव

सांगली : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब पटकावून कुस्तीविश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करणारा स्टार पैलवान

PM YOJANA : पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS); एनसीसी छात्रांसाठी सुवर्णसंधी

PUNE : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) महाराष्ट्र संचालनालयाने 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PMIS) अंतर्गत राज्यातील एनसीसी