पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल पाडले जाणार, कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पुणे:  तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर (Kundmala Bridge Collapses), पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिल्या असून,  या संदर्भातली बैठक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे.


मावळ येथील इंदुरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी पूल रविवारी कोसळला. हा पूल ३० वर्ष जुना आणि गंजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे जिल्ह्यातील गावं आणि वस्त्यांना जोडणाऱ्या सर्व जुन्या लोखंडी पादचारी पूलांची अवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण, जिल्ह्यात असे अनेक लोखंडी पूल आहेत, जे धोकादायक स्थितीत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढे देखील अशी घटना घडण्याचा संभव अधिक असल्यामुळे, हे सर्व धोकादायक पूल पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.


पुणे शहरापासून काही अंतरावर असलेले शांत आणि जास्त वर्दळ नसलेले स्थळ म्हणून कुंडमळा ओळखले जाते. इंद्रायणी नदी आणि कुंडराई देवीचे मंदिर तसेच नजीक असलेले छोटेसे धरण यामुळे कुंडमळाचा निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो. त्यात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याकारणामुळे शे-दोनशे पर्यटकांनी  या ठिकाणी गर्दी केली होती. दरम्यान हा दुर्दैवी अपघात घडला.



एकाच वेळी 100 ते 150 पर्यटक पुलावर आल्याने पूल कोसळला


एरव्ही शांतता आणि कमी वर्दळ असलेल्या या ठिकाणी रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. १०० ते १५० पर्यटक पुलावर उभे होते. फोटो काढण्यासाठी पर्यटकांनी पुलावर एकच गर्दी केली होती. त्याचवेळी इंद्रायणी नदीचा प्रवाह देखील प्रचंड होता, शिवाय पूल देखील ३० वर्ष जुना गंजलेल्या अवस्थेमध्ये होता. त्यामुळे, पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल मधोमध तुटून कोसळला. ज्यामध्ये अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, तर काही पूलाखाली अडकून पडले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ५१ जणांना वाचवण्यात यश आले. रविवारी रात्री उशिरापर्यंत NDRF व स्थानिक बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू होते. सोमवारी सकाळपासून ड्रोनच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्यांचा शोध घेतला गेला.


Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून