भारताचा कसोटी कर्णधार न होण्याबाबत जसप्रीत बुमराहने सोडले मौन

लंडन:  जसप्रीत बुमराहने अखेर भारताच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल आपले मौन सोडले आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीची पहिली पसंती तोच होता. मात्र, कामाच्या ताणामुळे त्याने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद नाकरलं असल्याचं बुमराहने स्पष्ट केलं आहे.


रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची भारताच्या कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली. कसोटी संघाचा उपकर्णधार आणि रोहितच्या अनुपस्थितीत तीन कसोटी सामन्यांमध्ये म्हणजेच एक इंग्लंडमध्ये आणि दोन ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा बुमराह रोहित शर्माचा उत्तराधिकारी असायला हवा होता. पण ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटीत त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे सर्व काही बदलले.


जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीत सांगितले की, ‘’रोहित आणि कोहली यांनी गेल्या महिन्यात कसोटी निवृत्तीची घोषणा केली. आणि आयपीएल दरम्यान मी बीसीसीआय अधिकाऱ्यांशी आणि निवड समितीशी आपल्या कामाच्या ताणाबद्दल चर्चा केली होती. डॉक्टर आणि फिजिओंनी मला क्रिकेट कारकीर्दी वाढवण्यासाठी तंदुरुस्तीवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला होता. आणि त्यामुळे मला कर्णधारपद सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला.’’

Comments
Add Comment

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

क्रिकेटमध्ये पाकिस्तानशी तर हॉकीमध्ये चीनशी... रविवारी भारताची दुहेरी 'कसोटी'!

उद्याचा रविवार क्रीडाप्रेमींसाठी दुहेरी थरार, हॉकी आणि क्रिकेटचे दोन्ही सामने महत्वाचे! नवी दिल्ली: उद्या दि. १४

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे