भारताचा कसोटी कर्णधार न होण्याबाबत जसप्रीत बुमराहने सोडले मौन

  60

लंडन:  जसप्रीत बुमराहने अखेर भारताच्या कसोटी कर्णधारपदाबद्दल आपले मौन सोडले आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीची पहिली पसंती तोच होता. मात्र, कामाच्या ताणामुळे त्याने भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद नाकरलं असल्याचं बुमराहने स्पष्ट केलं आहे.


रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलची भारताच्या कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली. कसोटी संघाचा उपकर्णधार आणि रोहितच्या अनुपस्थितीत तीन कसोटी सामन्यांमध्ये म्हणजेच एक इंग्लंडमध्ये आणि दोन ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारा बुमराह रोहित शर्माचा उत्तराधिकारी असायला हवा होता. पण ऑस्ट्रेलियातील सिडनी कसोटीत त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे सर्व काही बदलले.


जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीत सांगितले की, ‘’रोहित आणि कोहली यांनी गेल्या महिन्यात कसोटी निवृत्तीची घोषणा केली. आणि आयपीएल दरम्यान मी बीसीसीआय अधिकाऱ्यांशी आणि निवड समितीशी आपल्या कामाच्या ताणाबद्दल चर्चा केली होती. डॉक्टर आणि फिजिओंनी मला क्रिकेट कारकीर्दी वाढवण्यासाठी तंदुरुस्तीवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला होता. आणि त्यामुळे मला कर्णधारपद सोडण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला.’’

Comments
Add Comment

यशस्वी जयस्वालकडे द्रविड, सेहवागच्या विक्रमाला मागे टाकण्याची संधी

लंडन : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नवा विक्रम करण्यासाठी सज्ज

Women’s World Cup 2025 : ठरलं...ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमध्ये २०२५ च्या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकात

दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत याजिक हिलांगने जिंकले सुवर्णपदक

नवी दिल्ली : केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी

क्रिकेटच्या नव्या नियमानुसार 'बन्नी हॉप कॅच' अवैध ठरणार

लॉर्ड्स : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. सर्व नवे नियम कसोटी

डब्ल्यूटीसी फायनल : ऑस्ट्रेलियाला पराभूत करत द.आफ्रिकेने २७ वर्षांनी पटकावले आयसीसी विजेतेपद

ऑस्ट्रेलियाला नमवत 'चोकर्स' पुसला डाग लंडन : डब्ल्यूटीसी फायनल्स अर्थातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीपच्या सामन्यात

ICC Rankings: टी-२० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये तिलक वर्माची मोठी झेप, टॉप ६मध्ये ३ भारतीय

मुंबई: बुधवारी आयसीसीने ताजी रँकिंग जाहीर केली. यात टी-२० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये भारताचा दबदबा कायम राहिला आहे.