Bomb Threat Call: नागपूरमध्ये इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, बॉम्बच्या धमकीचा फोन

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्बची धमकी आल्याने एकच खळबळ


नागपूर: आज मंगळवारी दिनांक १७ जून रोजी, कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्स (IndiGo Airlines) च्या विमानात बॉम्बची धमकी (Bomb Threat Call) असल्याचा फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग (Flight Emergency Landing) करण्यात आले, जिथे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि विमानाची तपासणी करण्यात आली.


आज सकाळी ९:२० वाजता कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमान क्रमांक ६ई २७०६ मध्ये बॉम्बची धमकी आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर ते नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार, तात्काळ एक आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली, ज्यामध्ये धमकी गंभीर असल्याची पुष्टी करण्यात आली कारण त्यात फ्लाइट नंबर देखील स्पष्टपणे देण्यात आला होता. तोपर्यंत विमान कोचीहून उड्डाण घेऊन निघाले होते, जे सुरक्षेच्या कारणास्तव नागपूर विमानतळावर वळवण्यात आले. सध्या विमान आणि प्रवाशांची चौकशी सुरू आहे.



एअर इंडियाच्या विमानालाही धमकी


तत्पूर्वी शुक्रवाई, थायलंडमधील फुकेतहून नवी दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-३७९ या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. फुकेत विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन प्रक्रियेनंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की एअर इंडियाच्या विमानात १५६ प्रवासी होते. विमान फुकेतहून दिल्लीला येत होते शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाने उड्डाण केले, परंतु अंदमान समुद्राभोवती फिरत 20 मिनिटांच्या उड्डाणानंतर, स्थानिक वेळेनुसार सकाळी ११.३८ वाजता फुकेत विमानतळावर परत आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यानंतर झालेल्या तपासणीनंतर बॉम्बसारखी कोणतीच गोष्ट विमानात नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर