शालेय निधी व्यवहारात गैरप्रकार आढळ्यास कारवाई होणार, पालकमंत्री उदय सामंत यांचा आदेश...

रत्नागिरी : राज्यात अनेक ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचा आढावा पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला. शिक्षण क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांना उदय सामंतानी चांगलंच धारेवर धरलं. जिल्हातील 5 हजार 830 शिक्षकांपैकी किती शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नवीन उपक्रम राबवले आहेत ? पंतप्रधान अंतर्गत निधीतून काय काम केली ? विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी कोणते उपक्रम राबवले आहेत ? यांसारखे अनेक प्रश्न विचारुन उदय सामंत यांनी शिक्षकांची चांगली शाळा घेतली.

तसेच उदय सामंत यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला, रत्नागिरी येथील वाडा याठिकाणी शिक्षकांने विश्रांतीगृह सुरु केले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला झोप आली. तर वडिलांप्रमाणे विद्यार्थ्याला झोपवलं जातं विद्यार्थी झोपेतून जागा झाल्यानंतर पुन्हा शिकवलं जातं. सामाजिक कार्य म्हणून 365 दिवस विद्यार्थ्यांना  शिकवण्याचं काम शिक्षक करत असतात. तसेच काही शिक्षक विद्यार्थ्यांना बागेत खेळता यावं यासाठी बाग तयार करतात.काही शाळेतील विद्यार्थी इंग्रजी आणि मराठी एकाच वेळी लिहितात. अशा शिक्षकांचं मार्गदर्शन ठेवायला हव, अशी सुचना उदय सामंत यांनी केली...

तसेच उदय सामंत यांनी पंतप्रधान योजने अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या शाळांना अहवाल देखील मागवला. यामध्ये काही गैरप्रकार आढळला तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

शालेय पोषणा संदर्भात अँप तयार करण्यात यावे. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यात यावी. ज्या शाळेत पटसंख्या वाढवलेली आहे. त्या शाळेची माहिती गावागावत जाऊन सांगावी. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि