Jalgaon Crime: जळगाव हादरले! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ

शेजारच्या गावात सापडला मृतदेह, नरबळीच्या संशयाने खळबळ


जळगाव: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एका १३ वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत मुलाचा मृतदेह शेजारील गावच्या  शेतात फेकून देण्यात आला होता, ही घटना नरबळीसाठी तर घडवून आणली गेली नाही ना, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अखंड जळगाव यामुळे हादरलं आहे. पोलिसांनी सदर घटनेची तात्काळ नोंद करून पुढील तपासणीला सुरूवात केली आहे.


तेजस महाजन (वय १३) असं मृत मुलाचं नाव असून तो रिंगणगाव येथे राहणारा, तो काल म्हणजेच दिनांक १६ जूनपासून बेपत्ता झाला होता. तेजस अचानक दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोधाशोध सुरू केली होती, मात्र कुठेच त्याचा पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांनी शोध घेतला, मात्र त्याचा काहीही मागमूस लागला नाही. अखेर १७ जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ताबाबतची तक्रार दाखल करण्यात आली.


खर्ची गावाजवळील एका शेतात तेजसचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात तेजसच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले. सदर घटनेचा पोलीस विविध अंगाने तपास करत असून अद्याप हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.


Comments
Add Comment

उबाठा-मनसे युती म्हणजे अस्तित्वहीन पक्षांची अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उबाठा आणि मनसेची अधिकृत युती जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही तर पक्ष अस्तित्वासाठी एकत्र

हा तर संधीसाधूंचा सत्ता पिपासूपणा, भाजपा नेते मंत्री ॲड. आशिष शेलार यांची टीका मुंबई: मराठी माणसाने तुम्हाला

Gold Silver Rate: सलग चौथ्यांदा सोने चांदी पुन्हा नव्या उच्चांकावर, चांदी एक सत्रात प्रति किलो १०००० रूपयांनी महाग

मोहित सोमण: जागतिक पातळीवरील अस्थिरतेचा फटका म्हणून सलग चौथ्यांदा सोनेचांदीत तुफान वाढ झाली आहे. सोन्याचांदीने

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

टाटा मोटर्सकडून ईव्ही गाड्यांची विक्रमी विक्री,संपूर्ण ईव्ही बाजारातील ६६% बाजार हिस्सा कंपनीकडून कॅप्चर

तब्बल २५०००० ईव्ही विक्रीचा टप्पा पार मुंबई: टाटा मोटर्सने मोठ्या प्रमाणात बी कॉर्पोरेट रिकस्ट्रक्चरिंग