माणगावमध्ये लोकवस्तीनजीक आढळून आले मगरीचे घरटे

वनविभागामार्फत त्वरित घरट्याला देण्यात आले संरक्षण


माणगाव : माणगांव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे, काळ नदीकिनारी त्यांना मुबलक नैसर्गिक अधिवास आहे, माणगांव शहर हे पूर्वी छोटे गाव होते त्याची आता व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे, परिणामतः हे वन्यजीव व ह्या मगरी शहरामध्ये मानववस्तीनजीक दिसून येत आहेत, गेल्यावर्षीदेखील शहराच्या मध्यभागातुन मोठ्या मगरीला रेस्क्यू करण्यात आलेले होते.



खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदीकिनारी एका मगरीचे घरटे आढळून आले आहे, येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत, खबरदारी म्हणून माणगांव वनविभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे येथे सुरक्षित केले आहे जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिल्लांना कोणतीही इजा पोहोचणार नाही, व मोठ्या मगरीपासून पिल्लांच्या बचावाकरिता देखील, कोणत्याही नागरिकांवर मगरीच्या हल्ला होणार नाही व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, सदरचा परिसर वनविभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आला आहे. सदरचे मगरीचे घरटे सुरक्षित करण्याकरिता माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, व वनपाल ज्ञानदेव सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन चौधरी व वनमजूर गणेश शिर्के, सुनिल तोंडलेकर, अनिल पवार, रुपेश हिलम व बाळू जाधव यांनी योग्य ती कार्यवाही केली आहे.


सद्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये आता ह्या मगरी नदीला येत असणाऱ्या मोठ्या पुरामुळे प्रवाहात वरती छोट्या ओढ्यामध्ये व शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते, त्यामुळे नदीकिनारील नागरिकांनी भयभीत न होता तसेच मगर पाहण्यासाठी गर्दी ना करता, मगरींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता वनविभागाकडे किंवा स्थानिक बचावपथकांकडे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याकडून करण्यात आले आहे.


नदीकिनारील नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घ्यावी, पूरपरिस्थितींमुळे, मगरी-साप तसेच इतर वन्यजीव मानववस्तीनजीक आसरा घेण्यासाठी येऊ शकतात, नागरिकांना खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा, वनविभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित