माणगावमध्ये लोकवस्तीनजीक आढळून आले मगरीचे घरटे

वनविभागामार्फत त्वरित घरट्याला देण्यात आले संरक्षण


माणगाव : माणगांव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे, काळ नदीकिनारी त्यांना मुबलक नैसर्गिक अधिवास आहे, माणगांव शहर हे पूर्वी छोटे गाव होते त्याची आता व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे, परिणामतः हे वन्यजीव व ह्या मगरी शहरामध्ये मानववस्तीनजीक दिसून येत आहेत, गेल्यावर्षीदेखील शहराच्या मध्यभागातुन मोठ्या मगरीला रेस्क्यू करण्यात आलेले होते.



खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदीकिनारी एका मगरीचे घरटे आढळून आले आहे, येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत, खबरदारी म्हणून माणगांव वनविभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे येथे सुरक्षित केले आहे जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिल्लांना कोणतीही इजा पोहोचणार नाही, व मोठ्या मगरीपासून पिल्लांच्या बचावाकरिता देखील, कोणत्याही नागरिकांवर मगरीच्या हल्ला होणार नाही व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, सदरचा परिसर वनविभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आला आहे. सदरचे मगरीचे घरटे सुरक्षित करण्याकरिता माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, व वनपाल ज्ञानदेव सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन चौधरी व वनमजूर गणेश शिर्के, सुनिल तोंडलेकर, अनिल पवार, रुपेश हिलम व बाळू जाधव यांनी योग्य ती कार्यवाही केली आहे.


सद्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये आता ह्या मगरी नदीला येत असणाऱ्या मोठ्या पुरामुळे प्रवाहात वरती छोट्या ओढ्यामध्ये व शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते, त्यामुळे नदीकिनारील नागरिकांनी भयभीत न होता तसेच मगर पाहण्यासाठी गर्दी ना करता, मगरींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता वनविभागाकडे किंवा स्थानिक बचावपथकांकडे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याकडून करण्यात आले आहे.


नदीकिनारील नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घ्यावी, पूरपरिस्थितींमुळे, मगरी-साप तसेच इतर वन्यजीव मानववस्तीनजीक आसरा घेण्यासाठी येऊ शकतात, नागरिकांना खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा, वनविभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

Comments
Add Comment

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी आंतरराष्ट्रीय सेवेला सुरुवात झाली. याअंतर्गत एअर इंडिया

Vadkhal Bypass : वडखळ बायपासची दुरवस्था; अपूर्ण कामातच टोलवसुलीमुळे वाहनचालक संतप्त

रायगड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ बायपासची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून, पावसाळ्यात हा

Matheran's Honeymoon Point : माथेरानच्या हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन; सीसीटीव्हीत थरारक दृश्य कैद

रायगड : माथेरानच्या प्रसिद्ध हनिमून पॉईंट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण

Kokan Railway : प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद; 16 जुलैपासून इंटरसिटी, डेक्कन क्वीन पुन्हा रुळावर

रायगड : मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता अतिरिक्त गाड्या

Mumbai-Goa Express Highway : कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद, एकाच लेनवरून दुहेरी वाहतूक

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस थेट विमान सेवा

नवी मुंबई विमानतळ : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NHIA)