माणगावमध्ये लोकवस्तीनजीक आढळून आले मगरीचे घरटे

वनविभागामार्फत त्वरित घरट्याला देण्यात आले संरक्षण


माणगाव : माणगांव तालुक्यात काळ नदीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे, काळ नदीकिनारी त्यांना मुबलक नैसर्गिक अधिवास आहे, माणगांव शहर हे पूर्वी छोटे गाव होते त्याची आता व्याप्ती वाढलेली आहे त्यामुळे जवळील वन्यजीवांच्या नैसर्गिक निवासस्थानांवर परिणाम होत असल्याचा दिसून येत आहे, परिणामतः हे वन्यजीव व ह्या मगरी शहरामध्ये मानववस्तीनजीक दिसून येत आहेत, गेल्यावर्षीदेखील शहराच्या मध्यभागातुन मोठ्या मगरीला रेस्क्यू करण्यात आलेले होते.



खांदाड गावात सोनभैरव मंदिर परिसरात काळ नदीकिनारी एका मगरीचे घरटे आढळून आले आहे, येथे मगरीची अनेक पिल्ले दिसून येत आहेत, खबरदारी म्हणून माणगांव वनविभागाने तत्परतेने त्वरित योग्य ती कारवाई करून ह्या मगरीचे घरटे येथे सुरक्षित केले आहे जेणेकरून ह्या मगरीला व तिच्या पिल्लांना कोणतीही इजा पोहोचणार नाही, व मोठ्या मगरीपासून पिल्लांच्या बचावाकरिता देखील, कोणत्याही नागरिकांवर मगरीच्या हल्ला होणार नाही व कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे, सदरचा परिसर वनविभागाकडून त्वरित निषिद्ध करण्यात आला आहे. सदरचे मगरीचे घरटे सुरक्षित करण्याकरिता माणगांव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत शिंदे, व वनपाल ज्ञानदेव सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक पवन चौधरी व वनमजूर गणेश शिर्के, सुनिल तोंडलेकर, अनिल पवार, रुपेश हिलम व बाळू जाधव यांनी योग्य ती कार्यवाही केली आहे.


सद्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये आता ह्या मगरी नदीला येत असणाऱ्या मोठ्या पुरामुळे प्रवाहात वरती छोट्या ओढ्यामध्ये व शेतांमध्ये घुसण्याची शक्यता असते, त्यामुळे नदीकिनारील नागरिकांनी भयभीत न होता तसेच मगर पाहण्यासाठी गर्दी ना करता, मगरींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता वनविभागाकडे किंवा स्थानिक बचावपथकांकडे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन माणगावचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्याकडून करण्यात आले आहे.


नदीकिनारील नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घ्यावी, पूरपरिस्थितींमुळे, मगरी-साप तसेच इतर वन्यजीव मानववस्तीनजीक आसरा घेण्यासाठी येऊ शकतात, नागरिकांना खबरदारी घेऊन त्वरित वनविभागाकडे संपर्क साधावा, वनविभाग वन्यजीव व नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.

Comments
Add Comment

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव