यशस्वी जयस्वालकडे द्रविड, सेहवागच्या विक्रमाला मागे टाकण्याची संधी

लंडन : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वाल इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गजांना मागे टाकण्याची त्याला या कसोटी मालिकेत नामी संधी मिळणार आहे.


२०२३ मध्ये त्याने भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर आपल्या भोवती एक वेगळ वलय निर्माण केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद २००० धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे चालून आली आहे.


यशस्वी जायस्वालने सध्या १९ कसोटी सामन्यांमध्ये ३९ डावांमध्ये ५२.८८ च्या सरासरीने १७९८ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि दहा अर्धशतकांचा समावेश आहे. यशस्वी जायस्वालने या कसोटी मालिकेत पुढील तीन डावांमध्ये २००० धावांचा टप्पा पूर्ण केला


तर तो राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागला मागे टाकून भारतासाठी कसोटीत सर्वात जलद २००० धावा पूर्ण करणारा भारतीय फंलदाज बनणार आहे. द्रविड आणि सेहवाग दोघांनीही ४० डावांमध्ये हा टप्पा गाठला आणि म्हणूनच इंग्लंडमधील आगामी मालिकेत जायस्वालसाठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची ही एक नामी संधी आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण