plane crash: कोणत्या देशात होतात सर्वाधिक विमान अपघात, आकडा पाहून व्हाल हैराण

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्यांनाच हादरवून टाकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर जे व्हिडिओ समोर आले ते हैराण कऱणारे होते. या दुर्घटनेतील मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कारही झाले नाही तोच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.


या घटनेवरून तुम्हाला वाटत असेल की भारतात हे अपघात सर्वाधिक होत असावेत. मात्र जगात असा एक देश आहे जिथे सर्वाधिक विमान अपघात झाले आहेत.


अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश होण्याआधी १० वर्षांपूर्वी सर्वात मोठा विमान अपघात २०२०मध्ये झाला होता. या दरम्यान फ्लाईट दुबईवरून परतत होती आणि केरळमध्ये पाऊस होत असल्याने विमान रनवेवर घसरून त्याचे दोन तुकडे झाले होते. यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात १९० लोक प्रवास करत होते.



सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात झाले?


सर्वाधिक विमान अपघातांबाबत बोलायचे झाल्यास यात अमेरिका अव्वल स्थानावर आहे. येथे सर्वाधिक विमान अपघात होतात. एका रिपोर्टनुसार १९४५ ते २०२२ या दरम्यान गेल्या ७७ वर्षांत अमेरिकेत एकूण ८६४ विमान अपघात झाले आहेत. याच्या हिशेबाने दरवर्षी येथे ११ ते १२ अपघात अमेरिकेत होतात. यात दुसऱ्या स्थानावर रशिया हा देश आहे. येथे एकूण अपघातांची संख्या ५३९ आहे. यानंतर कॅनडा १९१ आणि ब्राझील १९० अपघात झालेत. कोलंबिया पाचव्या स्थानावरून असून तेथे १८४ अपघात झालेत.



आशियामध्ये विमान अपघातात टॉपमध्ये हे देश


सर्वाधिक विमान अपघातांच्या यादीत भारत १०व्या स्थानावर आहे. भारतात गेल्या ७७ वर्षात ९५ विमान अपघात झालेत. भारतानंतर चीनचा नंबर लागतो. चीनमध्ये ७६ विमान अपघाताच्या घटना घडल्यात.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने