plane crash: कोणत्या देशात होतात सर्वाधिक विमान अपघात, आकडा पाहून व्हाल हैराण

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्यांनाच हादरवून टाकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर जे व्हिडिओ समोर आले ते हैराण कऱणारे होते. या दुर्घटनेतील मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कारही झाले नाही तोच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.


या घटनेवरून तुम्हाला वाटत असेल की भारतात हे अपघात सर्वाधिक होत असावेत. मात्र जगात असा एक देश आहे जिथे सर्वाधिक विमान अपघात झाले आहेत.


अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश होण्याआधी १० वर्षांपूर्वी सर्वात मोठा विमान अपघात २०२०मध्ये झाला होता. या दरम्यान फ्लाईट दुबईवरून परतत होती आणि केरळमध्ये पाऊस होत असल्याने विमान रनवेवर घसरून त्याचे दोन तुकडे झाले होते. यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात १९० लोक प्रवास करत होते.



सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात झाले?


सर्वाधिक विमान अपघातांबाबत बोलायचे झाल्यास यात अमेरिका अव्वल स्थानावर आहे. येथे सर्वाधिक विमान अपघात होतात. एका रिपोर्टनुसार १९४५ ते २०२२ या दरम्यान गेल्या ७७ वर्षांत अमेरिकेत एकूण ८६४ विमान अपघात झाले आहेत. याच्या हिशेबाने दरवर्षी येथे ११ ते १२ अपघात अमेरिकेत होतात. यात दुसऱ्या स्थानावर रशिया हा देश आहे. येथे एकूण अपघातांची संख्या ५३९ आहे. यानंतर कॅनडा १९१ आणि ब्राझील १९० अपघात झालेत. कोलंबिया पाचव्या स्थानावरून असून तेथे १८४ अपघात झालेत.



आशियामध्ये विमान अपघातात टॉपमध्ये हे देश


सर्वाधिक विमान अपघातांच्या यादीत भारत १०व्या स्थानावर आहे. भारतात गेल्या ७७ वर्षात ९५ विमान अपघात झालेत. भारतानंतर चीनचा नंबर लागतो. चीनमध्ये ७६ विमान अपघाताच्या घटना घडल्यात.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने