plane crash: कोणत्या देशात होतात सर्वाधिक विमान अपघात, आकडा पाहून व्हाल हैराण

  33

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघाताने साऱ्यांनाच हादरवून टाकले. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर जे व्हिडिओ समोर आले ते हैराण कऱणारे होते. या दुर्घटनेतील मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कारही झाले नाही तोच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.


या घटनेवरून तुम्हाला वाटत असेल की भारतात हे अपघात सर्वाधिक होत असावेत. मात्र जगात असा एक देश आहे जिथे सर्वाधिक विमान अपघात झाले आहेत.


अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान क्रॅश होण्याआधी १० वर्षांपूर्वी सर्वात मोठा विमान अपघात २०२०मध्ये झाला होता. या दरम्यान फ्लाईट दुबईवरून परतत होती आणि केरळमध्ये पाऊस होत असल्याने विमान रनवेवर घसरून त्याचे दोन तुकडे झाले होते. यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. या विमानात १९० लोक प्रवास करत होते.



सर्वाधिक विमान अपघात कोणत्या देशात झाले?


सर्वाधिक विमान अपघातांबाबत बोलायचे झाल्यास यात अमेरिका अव्वल स्थानावर आहे. येथे सर्वाधिक विमान अपघात होतात. एका रिपोर्टनुसार १९४५ ते २०२२ या दरम्यान गेल्या ७७ वर्षांत अमेरिकेत एकूण ८६४ विमान अपघात झाले आहेत. याच्या हिशेबाने दरवर्षी येथे ११ ते १२ अपघात अमेरिकेत होतात. यात दुसऱ्या स्थानावर रशिया हा देश आहे. येथे एकूण अपघातांची संख्या ५३९ आहे. यानंतर कॅनडा १९१ आणि ब्राझील १९० अपघात झालेत. कोलंबिया पाचव्या स्थानावरून असून तेथे १८४ अपघात झालेत.



आशियामध्ये विमान अपघातात टॉपमध्ये हे देश


सर्वाधिक विमान अपघातांच्या यादीत भारत १०व्या स्थानावर आहे. भारतात गेल्या ७७ वर्षात ९५ विमान अपघात झालेत. भारतानंतर चीनचा नंबर लागतो. चीनमध्ये ७६ विमान अपघाताच्या घटना घडल्यात.

Comments
Add Comment

Corona: धक्कादायक! आदल्या दिवशी बाळाचा जन्म, दुसऱ्या दिवशी आईचा मृत्यू

जबलपूर: मध्यप्रदेशच्या जबलपूर येथे एका बाळंतीणीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या

उत्तरप्रदेश : फटाका कारखाना स्फोटात ५ महिलांचा मृत्यू

अमरोहा : उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये ५ महिलांचा मृत्यू झाला

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार आदी १६ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

गलवानची ५ वर्षे : संघर्ष, संधी आणि संयमाचा प्रवास

गलवान खोऱ्यातील पाच वर्षे : भारत-चीन सीमा संघर्ष ते शांतता १५ जून २०२०... जी तारीख भारत-चीनदरम्यान झालेल्या भीषण

तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय-३१५ माघारी परतले आहे. विमानाच्या वैमानिकाला

Sonam Raghuvanshi: युट्यूबर्सच्या व्हिडिओत दिसले सोनम आणि राजा, डोंगर चढताना योगायोगाने कॅमेऱ्यात झाले कैद

नवी दिल्ली: हनिमूनसाठी मेघालयात गेलेल्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीचा एक नवीन व्हिडीओ आता समोर आला आहे.