महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे; बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार


मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी मंडळाच्या अद्ययावतीकरण व महसूल वाढीसाठी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केले.



मंत्री राणे यांच्या पाठपुराव्यास यश येऊन सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते आज मंत्रालयात मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.


यावेळी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, कॅप्टन खारा यांच्यासह सागरी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि जहाजाची प्रतिकृती देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. सागरी मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विभागाचा मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. कर्मचाऱ्यांनीही मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना तसेच नवनवीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास मंडळाचा महसूल वाढवण्याचे ध्येय लवकर साध्य करता येईल.

Comments
Add Comment

BMC : आयुक्त पोहोचले कांदिवलीत महापालिका अधिकाऱ्यांना धीर द्यायला

- पिझ्झा दुकान आणि दुचाकी दुकानांवर कारवाईचे दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) कांदिवली परिसरातील अनधिकृत

गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी वन्यजीव संवर्धन योजनेची अंमलबजावणी; वन विभागाकडे २० कोटी रुपये करणार जमा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पांतर्गत संजय

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्यास होणार १९ कोटींचा खर्च

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

मुंबई: आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दोन स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक

'भारतीय क्रिकेट संघाचा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद'

मुंबई : टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट

न्यूझीलंडचा दारुण पराभव करीत भारत बनला तिसऱ्यांदा विश्वविजेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले टीम इंडियाचे अभिनंदन

मुंबई : अहमदाबाद येथे झालेल्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६