महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे; बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

  30

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार


मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी मंडळाच्या अद्ययावतीकरण व महसूल वाढीसाठी एकत्रित काम करावे असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केले.



मंत्री राणे यांच्या पाठपुराव्यास यश येऊन सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते आज मंत्रालयात मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.


यावेळी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, कॅप्टन खारा यांच्यासह सागरी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि जहाजाची प्रतिकृती देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. सागरी मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विभागाचा मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. कर्मचाऱ्यांनीही मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना तसेच नवनवीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास मंडळाचा महसूल वाढवण्याचे ध्येय लवकर साध्य करता येईल.

Comments
Add Comment

अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरव

मुंबई : मराठीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळख प्राप्त करणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट या

मुंबईतील वॉटर मेट्रोच्या काम लवकरात लवकर सुरू करावे : ना. नितेश राणे

वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करण्याच्याही दिल्या सूचना मुंबई : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुळकर्णी यांच्यावर विक्रोळीत अंत्यसंस्कार

मुंबई : हिंदुत्ववादी विचाराचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे रविवारी विलेपार्ले येथे

Bomb Threat: मुंबईतील दोन नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी! शाळेच्या कॅम्पसची सुरक्षा वाढवली

मुंबईतील दोन नामांकित आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.  मुंबई: मुंबईतील दोन

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईसह कोकणात धुमाकूळ! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत मुंबई: उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला एअर इंडिया विमानाच्या प्रवासाचा अनुभव

मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला.या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त