तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय-३१५ माघारी परतले आहे. विमानाच्या वैमानिकाला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला. त्यामुळे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे परत उतरले. अधिकारी सध्या तांत्रिक समस्येचे नेमके कारण काय आहे याची तपासणी करत आहेत.

बोईंग७८७-८ ड्रीमलाइनरच्या या विमानाने हाँगकाँगहून नियोजित वेळेत उड्डाण केले होते.मात्र, उड्डाणानंतर वैमानानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय आला आणि त्याने हे विमान परत माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरल्यानंतर तांत्रिक समस्येचे स्वरूप अद्याप कळू शकलेले नाही.

एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एआय-३१५ हे विमान "तांत्रिक समस्येमुळे" हाँगकाँगला परतले आहे. दरम्यान,एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी हाँगकाँगहूनउड्डाण केले आणि एका तासापेक्षा जास्त वेळानंतर ते खाली उतरले.
Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या