तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय-३१५ माघारी परतले आहे. विमानाच्या वैमानिकाला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला. त्यामुळे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे परत उतरले. अधिकारी सध्या तांत्रिक समस्येचे नेमके कारण काय आहे याची तपासणी करत आहेत.

बोईंग७८७-८ ड्रीमलाइनरच्या या विमानाने हाँगकाँगहून नियोजित वेळेत उड्डाण केले होते.मात्र, उड्डाणानंतर वैमानानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय आला आणि त्याने हे विमान परत माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरल्यानंतर तांत्रिक समस्येचे स्वरूप अद्याप कळू शकलेले नाही.

एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एआय-३१५ हे विमान "तांत्रिक समस्येमुळे" हाँगकाँगला परतले आहे. दरम्यान,एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी हाँगकाँगहूनउड्डाण केले आणि एका तासापेक्षा जास्त वेळानंतर ते खाली उतरले.
Comments
Add Comment

राज्य स्थापनेनंतर ३८ वर्षांनी मिझोरमला मिळाली रेल्वे

मिझोरम : मिझोरम या राज्याची स्थापना २० फेब्रुवारी १९८७ रोजी झाली. राज्य स्थापनेनंतर जवळपास ३८ वर्षांनी मिझोरम

Pm Modi Mizoram Visit : मिझोरमला मोठी भेट! रेल्वेपासून हेलिकॉप्टरपर्यंत…पंतप्रधान मोदींच्या घोषणांनी मिझोरम गजबजला!

मिझोरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या दोन दिवसांच्या ईशान्य भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील सर्वात

पंतप्रधान मोदी मिझोरम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावर

मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये ३५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन करणार प. बंगाल आणि बिहारमध्ये

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

सावधान! आरोग्य मंत्रालयाचे सर्व राज्यांना अलर्ट जारी; मोठं संकट येणार की साथरोग?

पुरामुळे वाढतेय साथरोगाची भीती: आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना 'हाय अलर्ट' जारी, डेंग्यू आणि मलेरियाचा धोका

माधुरी हत्ती प्रकरण : कोल्हापूरला पाठवण्यावर तुर्तास निर्णय नाही

प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्याबाबत सर्वांचे एकमत नवी दिल्ली : कोल्हापूर