मुख्यमंत्री दौऱ्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल

पालघर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आदी मान्यवर सोमवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगाने मुंबई गुजरात मार्गावर काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात सकाळी ८ ते रात्री ८ वेळेत बदल करण्यात आले आहेत.


पालघर तालुक्यातील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने मनोर मैदान या ठिकाणी सामंजस्य करार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. हातनदी नाका ते नांदगाव फाटा यादरम्यान सर्व प्रकारची वाहतूक सोमवारी बंद ठेवण्यात आली आहे. तर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मस्तान नाका ते मनोर मार्गे पालघर शहराकडे येणाऱ्या व पालघर शहराकडून मनोर मार्गे मस्तान नाकाकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.


मनोर मुंबई गुजरात बाजूकडून पालघर बाजूकडे जाण्यासाठी चिल्हार फाटा बोईसर मार्गे पालघर व वरई फाटा -पारगाव- तांदुळवाडी - चहाडे नाका मार्गे पालघर अशाप्रकारे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालघरकडून मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता ते चहाडे नाका-तांदूळवाडी-पारगाव वरई फाटा हायवे अशाप्रकारे आणि गुजरातकडे जाण्यासाठी पालघर चार रस्ता ते बोईसर चिल्हार फाटा हायवे मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.


दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सदर आदेश लागू राहणार नाही असे प्रशासनाच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले असुन माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक