सर्वात मोठी बातमी WPI News : १४ महिन्यातील महागाईत सर्वाधिक घसरण! किरकोळ महागाईनंतर घाऊक महागाईतही 'इतक्या' टक्क्याने घट

महागाई कमी करण्यात मोदी सरकारला यश !


प्रतिनिधी: नुकताच भारत सरकारचा घाऊक महागाई निर्देशांक (Wholesale Price Index WPI) तात्पुरता डेटा जाहीर झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार भारताच्या घाऊक महागाई किंमत (Wholesale Inflation Price) मे महि न्यात ०.३९% घटली आहे. सकारात्मक अर्थव्यवस्थेतील चालनेमुळे बाजारातील घाऊक किंमत नियंत्रित ठेवण्यास भारताला यश आले आहे. एप्रिल महिन्यातील तुलनेत घाऊक किंमत निर्देशांक (WPI) ०.८५% खाली आला आहे. भारतीय वा णिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत म्हटल्याप्रमाणे, फेब्रुवारी व मार्च महिन्यात अनुक्रमे २.५१% व २.३८% महागाई दर होता. गेल्या १४ महिन्यातील घाऊक महागाईतील सर्वाधिक घसरण झाली आहे.


मुख्यतः एप्रिल महिन्यातील महागाई दर हा अन्न, इलेक्ट्रिसिटी, इतर उत्पादने, केमिकल, दळणवळण या क्षेत्रातील झालेल्या दरवाढीमुळे झालेली असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. मात्र प्राथमिक वस्तू, इंधन, उर्जा यामधील निर्देशांकात घट झाल्याने बाजारात किंमतीचा निर्देशांक घटण्यास मदत झाली आहे. प्राथमिक वस्तूतील एप्रिल महिन्यातील १.४४% महागाईच्या तुलनेत मे महिन्यात २.०२% घट झाली आहे. उर्जा व इंधन यामध्ये एप्रिलमधील २.१८% तुलनेत मे महिन्यात २.२७% महागाई निर्देशांकात घट झाली आहे. उत्पादित वस्तूत (Manufacturing Commodities) मध्ये एप्रिलमधील २.६२% तुलनेत निर्देशांकात घट होत मे महिन्यात २.०४% पातळीवर पोहोचली आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) प्रामुख्याने चलनविषयक धोरण तयार करताना किरकोळ महागाईचा विचार करते. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात किरकोळ महागाई सहा वर्षांपेक्षा सर्वाधिक कमी म्हण जे २.८% आहे, मुख्यतः प्राथमिक अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे किंमत आटोक्यात येणे शक्य झाले आहे. महागाई कमी होत असताना आरबीआयने या महिन्यात बेंचमार्क वित्तीय पतधोरण धोरणात व्याजदरात ०.५० बेसिस पूर्णांका ने घट करून ६% वरून ५.५० टक्क्यांवर रेपो दर (Repo Rate) आणला होता. यांचा एकत्रित परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज ४ टक्क्यांच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा ३.७ टक्क्यांनी कमी केला आहे, कारण आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे कोअर महागाई सौम्य राहण्याची अपेक्षा बाजारातील तज्ञांना आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) प्रामुख्याने चलनविषयक धोरण तयार करताना किरकोळ महागाईचा विचार करते. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार मे महिन्यात किरकोळ महागाई (Retail Inflation) सहा वर्षांपेक्षा सर्वांत कमी म्हणजे २.८२ टक्क्यांवर आली आहे. कारण आंतरराष्ट्रीय वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे कोअर महागाई सौम्य राहण्याची अपेक्षा आहे. किरकोळ महागाईतही अन्नधान्य महागाई कमी झाली, ती ०.९९ टक्क्यांपर्यंत घसरली होती. ऑक्टोबर २०२१ नंतरची ही सर्वात कमी पातळी गाठली आहे. देशभरातील वाढत्या कृषी उत्पादनामुळे अन्नधान्य महागाईत घट होण्याचा हा सलग सातवा महिना आहे.


आजच्या घाऊक महागाई किंमतीतील आकडेवारीनुसार डाळींच्या किमतीत दरवर्षीच्या तुलनेत १०.४१%, भाज्यांमध्ये २१.६२% आणि बटाट्यांमध्ये २९.४२% घट नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात, बिगर-खाद्य वस्तूंच्या (Non Food Commodities) किमती १.५३% वाढल्या, तर कच्च्या (Crude) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या किमती १२.४३% घसरल्या आहेत.


मागील आठवड्यातील आलेल्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित महागाई दर एप्रिलमध्ये ३.१६ % आणि गेल्या वर्षी मेमध्ये ४.०८% होता जो इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २.८२% पर्यंत कमी झाला आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण