Uttarakhand: केदारनाथजवळ गौरीकुंडच्या जंगलात हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह ७ जणांचा मृत्यू

उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामजवळ गुप्तकाशीसाठी उड्डाण केलेले आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात क्रॅश झाले आहे. या दुर्घटनेत पायलटसह ७ प्रवासी होते. यात एका मुलीचाही समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत साऱ्यांचाच मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून प्रवाशांना घेऊन गुप्तकाशीला परतत होते.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ५.१७ मिनिटांच्या सुमारास आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरने ६ भाविक आणि पायलटसह केदारनाथ हेलिपॅड येथून गुप्तकाशीसाठी टेकऑफ केले होते. रस्त्यात हवामान खराब असल्याने हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या दुर्घटनेत पायलटसह ७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. राजवीर असं या पायलटचं नाव आहे. विक्रम रावत, विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार, श्रद्धा आणि राशी(वय वर्षे १०) अशी मृत पावलेल्यांची नावे आहेत.


 


या अपघातामागे खराब हवामान हे कारण सांगितले जात आहे. केदारघाटीमध्ये प्रचंड धुके आणि वेगवान हवेमुळे हेलिकॉप्टर रस्ता हरवले होते. यानंतर हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि गौरीकुंडच्या जंगलात ते क्रॅश झाल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाली.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात