कृत्रिम तलावांची वाढवणार संख्या

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांसोबत मनपाची बैठक


विरार : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात यावर्षी गणेशोत्सवासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येईल, तसेच कृत्रिम तलावासाठी नागरिकांकडे जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही विचार केला जाईल असे मत असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी व्यक्त केले. मनपा मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्यामध्ये गणेशोत्सव संदर्भात नुकतीच बैठक पार पडली.



मागील वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेने एकूण १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ हजार ७०१ मूर्तींचे विसर्जन झाले होते, यापैकी एकूण १९ हजार ८५३ मूर्तींचे विसर्जन हे पालिकेने निर्मिती केलेल्या कृत्रिम तलाव, फिरते हौद यांमध्ये झाल्याची माहिती उप-आयुक्त अर्चना दिवे यांनी दिली. वसई विरार शहर हे तलावांचे शहर असून पीओपीच्या मूर्ती अशा नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करून तलाव दुषित न करण्याचे आवाहन अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केले. नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणाव्यात त्याचप्रमाणे मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, थर्मोकोलचा उत्सवात कमी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती निर्मिती संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत आयुक्त पवार यांनी माहिती दिली. जास्तीत जास्त शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे बाबत महापालिका प्रयत्नशील आहे असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. बैठकीचे संचालन सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी केले.


निःशुल्क परवानग्या एकाच ठिकाणी


गणेशोत्सव मंडळांसाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, महावितरण यांची एकाच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नि:शुल्क परवानग्या देण्यास लवकरच सुरुवात करण्यात येईल. मंडपात विद्युत कनेक्शन घेतेवेळी महावितरणाच्या सूचनेनुसार योग्य ती दक्षता घ्यावी, मिरवणुकीच्या वेळी उंचीमुळे विद्युत हायटेन्शन वायरला धक्का लागून अपघात होऊ नये याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात यावी यासाठी कमी उंचीच्या गणेशमूर्ती आणण्यावर मंडळांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.




  • मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी.

  • तलाव दूषित न करण्याचे आवाहन.

  • थर्मोकोलचा कमी वापर करा.

  • शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती जास्त प्रमाणात आणाव्यात

Comments
Add Comment

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal

Vasai Rain : मुसळधार पावसाचा फटका! वसईत इमारतीचा सज्जा कोसळला, रस्ते जलमय

वसई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असतानाच वसई (Vasai) परिसरात इमारतींशी संबंधित दुर्घटनांची (Building Accidents) मालिका सुरूच आहे.