कृत्रिम तलावांची वाढवणार संख्या

गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांसोबत मनपाची बैठक


विरार : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात यावर्षी गणेशोत्सवासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येईल, तसेच कृत्रिम तलावासाठी नागरिकांकडे जागा उपलब्ध असल्यास त्याबाबतही विचार केला जाईल असे मत असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांनी व्यक्त केले. मनपा मुख्यालयात महापालिका क्षेत्रातील मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्यामध्ये गणेशोत्सव संदर्भात नुकतीच बैठक पार पडली.



मागील वर्षी गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेने एकूण १०५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. महानगरपालिका क्षेत्रात एकूण ३३ हजार ७०१ मूर्तींचे विसर्जन झाले होते, यापैकी एकूण १९ हजार ८५३ मूर्तींचे विसर्जन हे पालिकेने निर्मिती केलेल्या कृत्रिम तलाव, फिरते हौद यांमध्ये झाल्याची माहिती उप-आयुक्त अर्चना दिवे यांनी दिली. वसई विरार शहर हे तलावांचे शहर असून पीओपीच्या मूर्ती अशा नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करून तलाव दुषित न करण्याचे आवाहन अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी केले. नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणाव्यात त्याचप्रमाणे मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी, थर्मोकोलचा उत्सवात कमी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती निर्मिती संदर्भात दिलेल्या निर्देशांबाबत आयुक्त पवार यांनी माहिती दिली. जास्तीत जास्त शाडूच्या मातीच्या मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी मूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणे बाबत महापालिका प्रयत्नशील आहे असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. बैठकीचे संचालन सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी केले.


निःशुल्क परवानग्या एकाच ठिकाणी


गणेशोत्सव मंडळांसाठी महानगरपालिका, पोलीस विभाग, महावितरण यांची एकाच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नि:शुल्क परवानग्या देण्यास लवकरच सुरुवात करण्यात येईल. मंडपात विद्युत कनेक्शन घेतेवेळी महावितरणाच्या सूचनेनुसार योग्य ती दक्षता घ्यावी, मिरवणुकीच्या वेळी उंचीमुळे विद्युत हायटेन्शन वायरला धक्का लागून अपघात होऊ नये याबाबतची दक्षता मंडळामार्फत घेण्यात यावी यासाठी कमी उंचीच्या गणेशमूर्ती आणण्यावर मंडळांनी प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी आयुक्तांनी केले.




  • मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी.

  • तलाव दूषित न करण्याचे आवाहन.

  • थर्मोकोलचा कमी वापर करा.

  • शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती जास्त प्रमाणात आणाव्यात

Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई