तालुक्यात विद्यार्थ्यांना गळक्या शाळेत गिरवावे लागणार धडे

मोखाडा : तालुक्यात ७ मे रोजी झालेल्या अवकाळी वादळीवाऱ्यासह पावसाने शासकीय मालमत्ता असलेल्या जिल्हा परिषद शाळांची प्रचंड वाताहत केलेली असून जवळपास सहा शाळांवरील पत्र्याचे छप्पर, वाऱ्याच्या वेगाने वीट बांधकाम तुटून पत्रे उडून गेले होते. या घटनेला एक महिना पूर्ण झालेला असून सोमवारपासून शाळांची घंटा वाजणार आहे. तरी देखील त्या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मुहूर्त मिळाला नसून विद्यार्थ्यांना गळक्या शाळेत बसून धडे गिरवण्याची वेळ आलेली आहे.



मागील मे महिन्यात तालुकाभरात झालेल्या जोरदार वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने ठाकुरवाडी, धामणशेत, कुर्लोद, घोसाळी, करोळ, पाचघर येथील जिल्हा परिषद शाळांची वाताहत झालेली असून वाऱ्याच्या वेगाने विट बांधकाम तुटून पत्रे उडून गेलेले आहेत. सुदैवाने अवकाळी पाऊस येण्याची वेळ ही शाळांना उन्हाळ्यातील सुट्टी लागण्याची असल्याने जीवितहानी टळली होती; परंतु सोमवारपासून शाळांची पुन्हा घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांची मात्र वर्गात बसायची अडचण होणार आहे. तर जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या छताची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतवर सोपवली असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे घोसाळी येथील जिल्हा परिषदेची शाळा ही नगरपंचायत हद्दीत येत असल्याने या शाळेच्या दुरुस्तीकरिता नगरपंचायत प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा घोसाळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गळक्या वर्ग खोलीत बसून धडे गिरवावे लागणार आहेत.


यामुळे अनावश्यक ठिकाणी संरक्षण भिंत बांधकाम, गटारी बांधकाम अशी एकनानेक कामे तत्काळ मंजूर करुन लाखो रुपये खर्च केले जातात मात्र देशाची भावी पिढी घडविण्याचे काम ज्या ज्ञान मंदिरामधून केले जाते अशा शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पैसे नाहीत हे मात्र अनाकलनीय आहे.




  • सोमवारपासून वाजणार शाळांची घंटा.

  • शाळांवरील पत्र्याच्या छप्पराची दुरवस्था.

  • दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाला मुहूर्त मिळेना



मागील महिन्यात अवकाळी वादळी पावसाने नुकसान झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या तात्पुरत्या दुरुस्ती करण्याची सूचना ग्रामपंचायतीना केलेली आहे. तर दोन वर्ग खोल्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्ग खोलीत बसविण्याच्या सूचना शिक्षकांना केल्या आहेत.
- वसंत महाले, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोखाडा


Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक