राज्यात आपात्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई : अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.


राज्यात कालपासून आज १४ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ३.४,रायगड २०, रत्नागिरी ४५, सिंधुदुर्ग ७०.८, पालघर ०.२, नाशिक १०.५, धुळे २.२, नंदुरबार ४.६, जळगाव ४.८, अहिल्यानगर ५.५, पुणे २३.८, सोलापूर ५.९, सातारा ८.८, सांगली २.६, कोल्हापूर ७, छत्रपती संभाजीनगर १६.७, जालना ७.८, बीड ७.६, लातूर २, धाराशिव ९.५, नांदेड ०.६, परभणी ०.७, हिंगोली ०.८, बुलढाणा २.७, अकोला ३, वाशिम १.८, अमरावती ०.६, यवतमाळ ०.८, नागपूर २.४, भंडारा ३.४, गोंदिया १.१, चंद्रपूर ०.४ आणि गडचिरोली ०.२.



इंद्रायणी नदी पात्रात देहू, आळंदी येथे एसडीआरएफ व एनडीआरएफ पथक


आषाढवारी निमित्ताने इंद्रायणी नदी पात्रात मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) एक पथक देहु येथ तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक आळंदी येथे तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



दोन व्यक्ती, तीन प्राण्यांचा मृत्यू


राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यू, नाशिक जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती मृत्यू आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील अडीवरे गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन पुलावरुन पाणी वाहत होते. स्थानिक प्रशासनाकडून वाहतुक बंद करण्यात आली होती. याबाबत स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


ठाणे जिल्ह्यातील तुर्भे एमआयडीसी येथे जनरेटरच्या धुरामुळे ग्रस्त झालेल्या २८ लोकांपैकी २६ व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून दोन व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

विधान परिषदेच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढणार ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; घबराट पसरवून पेट्रोल-डिझेलच्या पुरवठा साखळीत व्यत्यय आणू नये मुंबई : "विधान परिषद

BMC News : धक्कादायक! मुंबईच्या नालेसफाईत सापडली चक्क अख्खी रिक्षा; बीएमसीच्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर

Mumbai’s Iconic Vada Pav : मुंबईकरांच्या 'इमोशन'ला महागाईची फोडणी! मुंबईत वडापाव आणि मिसळ पावाच्या दरात प्रति पॅकेट थेट १० रुपयांची वाढ

मुंबई : मुंबईकरांची 'लाईफलाईन' आणि रोजच्या धावपळीच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेला वडापाव, तसेच खवय्यांची आवडती

Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील ‘कलिंगड डेथ केस’मध्ये मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठा आणि

Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा; मुंबईत ५ जूनपूर्वीच पावसाचे आगमन होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईकरांनो, आता छत्र्या आणि रेनकोट तयार ठेवा! प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी अखेर

आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार मुंबई : आपल्या कडक