Kundamala Bridge Collapsed : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आज, रविवारी कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये एकूण ३८ व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी १८ व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. २५ पेक्षाही अधिक लोकं या नदीत वाहून गेलीत तर काहीजण पुलाखाली दबली गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


रविवार असल्याने बरेच पर्यटक वर्षा सहलीसाठी आले होते. यातील कित्येकांनी जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलावर वाहनं उभी केली आणि ओव्हरलोड झाल्याने पूल कोसळला. दरम्यान, घटनास्थळी पुण्याचे जिल्हाधिकारी दाखल होत त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.


वीकेंड असल्यामुळे इंद्रायणी नदीचा वाढता प्रवाह पाहण्यासाठी सुमारे १०० ते १२० लोक घटनास्थळी जमले होते. काही लोक त्यांच्या दुचाकींसह पुलावर चढले, ज्यामुळे पुलाचा भार आणखी वाढला. जास्त भारामुळे पूल कोसळल्याचे मानले जात आहे. पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. स्थानिक पोलिस, अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचाव कार्य सुरू केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सदर घटनेबद्दल म्हणाले की या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर स्थानिक आमदार सुनील शेळके म्हणाले की या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तूर्तास मृतांचा अधिकृत आकडा समोर आला नसला तरी लवकरच ते जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,