भारत २०२९ पर्यंत महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा विश्वास


कणकवली : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देश सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बनविला. गेल्या अकरा वर्षांत जगात भारताची प्रतिमा उजळून निघाली. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. आज जपान सारख्या देशाला मागे टाकून आपण आर्थिकदृष्ट्या पुढे गेलो आहोत. २०१९ पर्यंत आपला भारत देश जगातील महासत्तेच्या पहिला दोन क्रमांकावर पोहोचणारा देश असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर ‘ऑपरेशन सिंदुर’च्या माध्यमातून मोदी सरकारने करारा जबाब देत नव्या भारताची ओळख जगाला करून दिली असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.



भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने विकसित भारताचा अमृत काल, सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हे मोदी सरकारची अकरा वर्षे विकासाची ध्येय दृष्टी गाठणारी होती याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संयोजक मनोज रावराणे, सहसंयोजक लखमराजे भोसले, डॉ. मिलिंद कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.


मंत्र नितेश राणे म्हणाले, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प सिद्धीस नेणारा भारत म्हणून हा पंतप्रधान मोदी यांचा अकरा वर्षाचा कालखंड ओळखला जाणार आहे. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारांमध्ये गुरफटलेला भारत दिसत होता. जगात भारताच्या पंतप्रधानाची पत हरवली गेली होती. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जग पातळीवर जो देशाला मान सन्मान मिळत आहे यातून आपल्या कारकीर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पोच पावती मिळते.
‘ना खाऊंगा ना खाणे दुंगा’ या भूमिकेमुळे २०१४ पासून ते आतापर्यंत भारत आज अकरा वर्षांत भ्रष्टाचार मुक्त झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारत देश खंबीर असल्याची पावती देणारे ऑपरेशन होते. देशातील नक्षल चळवळ संपुष्टात आणले आहे. मोदीच्या संकल्पना आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नातून नक्षल मुक्त भारत केला आहे. ३७० कायदा हटविला,राममंदिर उभे केले. भारत देश रोजगार देणारा देश बनला, असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Guardian Minister Nitesh Rane : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आणि 'महाप्रित' मध्ये सामंजस्य करार

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इमारतींवर सौरऊर्जेचा प्रकाश महाराष्ट्रील नाविन्यपूर्ण उपक्रम सर्वेक्षणाचे काम

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

​Sawantwadi : सावंतवाडी शहराला वादळाचा तडाखा

रामेश्वर प्लाझा इमारतीचे पत्रे उडाले पंचम खेमराज महाविद्यालयाच्या जुने इमारतीचे अतोनात नुकसान सावंतवाडी :

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात

Devendra Fadnavis and Narayan Rane : वाभाडे काढणं काय असतं, हे राणे साहेबांच्या भाषणातून शिकलो!" - देवेंद्र फडणवीसांनी जागवल्या विधानसभेतील आठवणी

कणकवली : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे (NarayanRane) यांचा ७४ वा वाढदिवस सिंधुदुर्गाच्या भूमीत मोठ्या दिमाखात

खासदार नारायण राणे यांना वाढदिवशी मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा

कणकवली : नारायण राणे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेली भाषणे ऐकण्याची बघण्याची संधी मला प्राप्त