भारत २०२९ पर्यंत महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा विश्वास


कणकवली : २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देश सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बनविला. गेल्या अकरा वर्षांत जगात भारताची प्रतिमा उजळून निघाली. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. आज जपान सारख्या देशाला मागे टाकून आपण आर्थिकदृष्ट्या पुढे गेलो आहोत. २०१९ पर्यंत आपला भारत देश जगातील महासत्तेच्या पहिला दोन क्रमांकावर पोहोचणारा देश असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर ‘ऑपरेशन सिंदुर’च्या माध्यमातून मोदी सरकारने करारा जबाब देत नव्या भारताची ओळख जगाला करून दिली असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.



भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने विकसित भारताचा अमृत काल, सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हे मोदी सरकारची अकरा वर्षे विकासाची ध्येय दृष्टी गाठणारी होती याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संयोजक मनोज रावराणे, सहसंयोजक लखमराजे भोसले, डॉ. मिलिंद कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.


मंत्र नितेश राणे म्हणाले, विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प सिद्धीस नेणारा भारत म्हणून हा पंतप्रधान मोदी यांचा अकरा वर्षाचा कालखंड ओळखला जाणार आहे. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारांमध्ये गुरफटलेला भारत दिसत होता. जगात भारताच्या पंतप्रधानाची पत हरवली गेली होती. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जग पातळीवर जो देशाला मान सन्मान मिळत आहे यातून आपल्या कारकीर्दीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पोच पावती मिळते.
‘ना खाऊंगा ना खाणे दुंगा’ या भूमिकेमुळे २०१४ पासून ते आतापर्यंत भारत आज अकरा वर्षांत भ्रष्टाचार मुक्त झाला. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारत देश खंबीर असल्याची पावती देणारे ऑपरेशन होते. देशातील नक्षल चळवळ संपुष्टात आणले आहे. मोदीच्या संकल्पना आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नातून नक्षल मुक्त भारत केला आहे. ३७० कायदा हटविला,राममंदिर उभे केले. भारत देश रोजगार देणारा देश बनला, असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'भारताला महासत्ता बनवण्याच्या प्रवासात सिंधुदुर्गचे योगदान मोलाचे असेल'

स्वातंत्र्यदिनी १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेत घालून दिला नवा आदर्श मुंबई : आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत आणि

Nitesh Rane : फळपीक विम्यातील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करा

- मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा मुंबई :

Sindhudurg : प्रशासन प्रभावीरित्या राबवण्यासाठी AI वापरणारा सिंधुदुर्ग देशातील पहिला जिल्हा, जाणून घ्या कसा केला AI चा वापर ?

मालवण : एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेकांना वाटतं की एआय हे बड्या

Sindhudurg News : देवगडच्या कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वाहून मृत्यू

सिंधुदुर्ग : कोकणात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि नागरिकांसाठी एक अत्यंत सावध करणारी आणि मन हेलावून

MSRTC : कोकणातील स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी; मालवण ते थेट अक्कलकोट नवीन एसटी बससेवा सुरू!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने कोकणातील स्वामी समर्थ भक्तांसाठी एक अत्यंत

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या