शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी

पालिकेच्या २,१०० शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश


मुंबई (प्रतिनिधी) : शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे 'मिशन अॅडमिशन' मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदार यादी पुनरीक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ जून २०२५ पूर्वीच शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत.


यामुळे आधीच शिक्षक कमतरतेचा सामना करणाऱ्या महापालिका शाळांमध्ये आणखी गोंधळ वाढेल. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. १२ जून रोजी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, मुंबई शहर आणि उपनगर विभागांत एकूण ८ हजार कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी आवश्यकता आहे.


त्यापैकी २,१०० कर्मचारी शिक्षण विभागातून, तर ४,९०० कर्मचारी आरोग्य विभागातून घेतले जाणार आहेत. बीएलओ आणि बीएलओ सुपरवायझर या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी ही नियुक्ती केली जाणार आहे.मुंबई शहर जिल्ह्यासाठी ४०० आणि उपनगर जिल्ह्यासाठी १,७०० शिक्षकांची मागणी करण्यात आली आहे.



पूर्णवेळ कार्यरत राहणार


शिक्षण अधिकान्यांनी ही नियुक्त शिक्षकांची नावे १५ जूनपूर्वी संख्या निश्चित करून, जिल्हाधिकारी मुंबई शहर आणि उपनगर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हे शिक्षक निवडणूक विभागात पूर्णवेळ कार्यरत राहतील, असेही या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. हे आदेश महापालिकेचे सामान्य प्रशासन अधिकारी स. तु. शिरवाडकर यांनी जारी केले आहेत. शिक्षक संघटनानी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.


महापालिकेच्या शाळामध्ये आधीच ८०० पेक्षा अधिक शिक्षकांची कमतरता आहे. शाळा सुरू होण्याच्या काळारा शिक्षकांना इतरत्र पाठवणे म्हणजे विद्याथ्यांचे नुकसान करण्यासारखे आहे. - शरद सिंग, अध्यक्ष, बृहन्मुंबई शिक्षक सभा


संबंधित पत्राबाबत अद्याप मला भेट माहिती नाही. पत्र कार्यालयात आले असेल, पत्र पहिल्यानंतरच मी सविस्तर बोलू शकेन. - राजेश ककाळ, शिक्षणाधिकारी,

Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या