ऐरोली सिलिंडर स्फोटानंतर मुंबईतील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

मुंबई (खास प्रतिनिधी): ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील सिलिंडर स्फोटाच्या दुघर्टनेनंतर दादर, वडाळा रेल्वे स्थानक तसेच फाईव्ह गार्डन परिसरातील बेकायदेशीर फेरीवाल्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्तांना निवेदन देवून खाद्यपदार्थ विक्रीसाठी सिलिंडर सारख्या ज्वलनशील वस्तू तथा पदार्थ जप्त करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.



अमेय घोले यांनी महापालिकेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात एका बेकायदेशीर फेरीवाल्याच्या दुकानात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे गंभीर अपघात घडला. अशा बेकायदेशीर फेरीवाल्यांकडे कोणतीही अधिकृत परवानगी आणि सुरक्षिततेची हमी किंवा नियंत्रण नसल्याने अशा घटनांनी नागरिकांचे प्राण धोक्यात येत आहेत. अशाप्रकारे चिंता व्यक्त करतानाच त्यांनी दुर्दैवाने, एफ उत्तर विभागातील दादर रेल्वे स्थानक, वडाळा रेल्वे स्थानक व फाईव्ह गार्डन परिसरातही अशा प्रकारचे बेकायदेशीर फेरीवाले मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडेही अशा प्रकारचे गॅस सिलिंडर, स्टोव्ह, इतर ज्वलनशील वस्तू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे अतिक्रमण केवळ वाहतुकीस अडथळा ठरत नाहीत, तर भविष्यात ऐरोलीसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण करते.

त्यामुळे या सर्व ठिकाणांवरील बेकायदेशीर फेरीवाल्यांची तपासणी करून त्वरित कारवाई करावी. तसेच जे फेरीवाले गॅस सिलिंडर, स्टोव्ह, किंवा तत्सम साहित्य वापरत आहेत, त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
Comments
Add Comment

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या

Samagra Shiksha Abhiyan : २२ वर्षांचा संघर्ष अखेर संपला! समग्र शिक्षा अभियानातील ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवाशाश्वती; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत (Samagra Shiksha Abhiyan) कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या ३,२७६

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई