मुंबई मेट्रो क्रमांक ९ मार्गिकेच्या कामाला वेग

दहिसर ते मीरा-भाईंदर मार्गाचे काम प्रगतिपथावर


मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७.१० किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदर दरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे.



या अंतर्गत, भाईंदर पश्चिम रस्ता उड्डाण पुलाजवळील (आरओबी) अत्यंत आव्हानात्मक आणि वर्दळीच्या परिसरात ६५ मीटर लांबीचा मिश्र स्टील गर्डर यशस्वीरित्या प्रस्थापित करण्यात आला. हे कार्य मर्यादित रात्रीच्या वेळेत विविध यंत्रणांमधील अचूक समन्वयाने पूर्ण करण्यात आले. ही कामगिरी सुरक्षितता, गुणवत्ता आणि वेळेच्या बंधनात उत्कृष्टतेने पार पाडण्यात एमएमआरडीएचे योगदान अधोरेखित करते.


लांबी – १०.५४ किमी | स्थानके – ८ उन्नत | एकूण प्रगती – ९५% गर्डर माप – ६५ मीटर लांब, ९.५७५ मीटर रुंद, सुमारे ७०० मेट्रिक टन वजनगर्डर रचना – ३ भागांमध्ये (प्रत्येकी सुमारे २३५ मेट्रिक टन वजन, ३ मीटरहून अधिक खोल) कार्यक्षेत्र – भाईंदर पश्चिम, पश्चिम रेल्वे मार्गावर (अतिशय आव्हानात्मक आणि दाट लोकवस्तीचा भाग)


अंमलबजावणी – ७, ८ व ११ जून २०२५ रोजी रात्री १.५ तासांच्या ब्लॉकमध्ये साधने–६०० मेट्रिक टन व ७५० मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन्स वापरले; ६०० मेट्रिक टनची एक राखीव क्रेन सहकार्य–पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे व वाहतूक पोलीस यांचे मोलाचे सहकार्य


संचालन उद्दिष्ट्ये –
टप्पा १ : दहिसर (पूर्व)–काशिगाव (डिसेंबर २०२५)
टप्पा २ : काशिगाव–नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (डिसेंबर २०२६) अशा महत्त्वपूर्ण टप्प्यांद्वारे एमएमआरडीए मुंबईतील नागरी वाहतूक व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी सातत्याने पुढे वाटचाल करत आहे.

Comments
Add Comment

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात

Mohan Bhagwat : अस्थिर जगाचा आधार केवळ भारतच; पण त्यासाठी शेवटच्या घटकाचा विकास हवा" – डॉ. मोहन भागवत

आदिवासी अस्मिता हीच देशाची ओळख"; कर्मयोगी एकल शिक्षक मेळाव्यात डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरक उद्गार सत्ता नव्हे, तर

First Tribal University : विदर्भात साकारणार देशातील पहिले आदिवासी विद्यापीठ

५०० कोटींच्या प्रकल्पातून शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व मुंबई : गेल्या तीन दशकांपासून आदिवासी आणि दुर्गम भागात

BMC News : मुंबईच्या महापौर रस्ते आणि नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर

रस्ते कामांचा वेग वाढवताना बांधकामात आणि दर्जा राखण्यात हयगय नको; प्रशासनाला दिले निर्देश मुंबई : रस्त्यांची

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर झाला पण टक्क्यांना लागलेली गळती कायम राहिली

मुंबई : महाराष्ट्र उच्च माध्यमिक आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची

Mumbai Crime : आधी विटेने वार, मग गळा आवळला...वांद्र्यातील ७८ वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या

मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) भागात उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावण्यात खेरवाडी पोलिसांना