ISRO ने वाचवले 4 अंतराळवीरांचे प्राण, भारताच्या शुभांशू शुक्लाचा समावेश असलेल्या रॉकेटचा संभाव्य अपघात टळला

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमुळे (ISRO) अंतराळातील संभाव्य अपघात टळला आहे. Axiom-4 मिशनसाठीच्या SpaceX Falcon-9 रॉकेटमध्ये उड्डाणापूर्वी आढळलेल्या गंभीर तांत्रिक दोषामुळे 4 अंतराळवीरांचा जीव धोक्यात येण्याची भीती होती. परंतु, इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या तांत्रिक सल्ल्यामुळे हा संभाव्य अपघात टळला आहे. यामध्ये भारताच्या शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) देखील सहभागी असल्याने ही घटना भारतासाठी अधिक महत्त्वाची ठरते.


इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी अमेरिकेतील Axiom-4 मोहिमेसाठी आवश्यक सुरक्षेच्या बाबतीत आपला ठामपणा दाखवत, फाल्कन-9 रॉकेटमधील संभाव्य धोका उघडकीस आणला. ही रॉकेट भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या 4 अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार होती. "लिक" (गळती) असलेल्या रॉकेटचे प्रक्षेपण 11 जून रोजी नियोजित होते. पण, इस्त्रोने सखोल चाचण्या आणि "लो टेंपरेचर लिक टेस्ट" ची मागणी केली. स्पेसएक्सकडून यावर तात्पुरत्या उपायांची तयारी होती. परंतु, इस्त्रोने ती साफ नाकारली.


यासंदर्भातील माहितीनुसार 7 सेकंदांची हॉट फायर टेस्ट दरम्यान ऑक्सिडायझरमध्ये द्रव ऑक्सिजन गळती आढळली होती. नंतरची तपासणी दरम्यान, ऑक्सिडायझर लाईनमध्ये वेल्ड क्रॅक (भेग) आढळली. ही भेग "रीसायकल आणि रिफर्बिशड" स्टेजमध्ये होती. ती अद्याप दुरुस्त केली नव्हती.इस्त्रोच्या तज्ज्ञांनी धरलेल्या आग्रहामुळे तो भाग बदलण्यात आला आणि पुन्हा चाचण्या करण्यात आल्या.डॉ. नारायणन हे क्रायोजेनिक इंजिन विकसित करणाऱ्या भारतीय पथकाचा भाग होते. त्यामुळे द्रव ऑक्सिजनसारख्या धोकादायक इंधनाशी संबंधित धोके त्यांना स्पष्ट माहीत होते.इस्त्रोच्या 13 सदस्यीय तज्ज्ञ पथकाने फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवर थेट हस्तक्षेप केला. त्यांनी "सेफ्टी फर्स्ट, लाँच लेटर" ही भूमिका घेतली. भारताचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे या मोहिमेत सहभागी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी इस्त्रोने आवश्यक तो धोरणात्मक निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पोलंड आणि हंगेरीनेही इस्त्रोच्या भूमिकेचे समर्थन केले.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे