ISRO ने वाचवले 4 अंतराळवीरांचे प्राण, भारताच्या शुभांशू शुक्लाचा समावेश असलेल्या रॉकेटचा संभाव्य अपघात टळला

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमुळे (ISRO) अंतराळातील संभाव्य अपघात टळला आहे. Axiom-4 मिशनसाठीच्या SpaceX Falcon-9 रॉकेटमध्ये उड्डाणापूर्वी आढळलेल्या गंभीर तांत्रिक दोषामुळे 4 अंतराळवीरांचा जीव धोक्यात येण्याची भीती होती. परंतु, इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या तांत्रिक सल्ल्यामुळे हा संभाव्य अपघात टळला आहे. यामध्ये भारताच्या शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) देखील सहभागी असल्याने ही घटना भारतासाठी अधिक महत्त्वाची ठरते.


इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी अमेरिकेतील Axiom-4 मोहिमेसाठी आवश्यक सुरक्षेच्या बाबतीत आपला ठामपणा दाखवत, फाल्कन-9 रॉकेटमधील संभाव्य धोका उघडकीस आणला. ही रॉकेट भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या 4 अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार होती. "लिक" (गळती) असलेल्या रॉकेटचे प्रक्षेपण 11 जून रोजी नियोजित होते. पण, इस्त्रोने सखोल चाचण्या आणि "लो टेंपरेचर लिक टेस्ट" ची मागणी केली. स्पेसएक्सकडून यावर तात्पुरत्या उपायांची तयारी होती. परंतु, इस्त्रोने ती साफ नाकारली.


यासंदर्भातील माहितीनुसार 7 सेकंदांची हॉट फायर टेस्ट दरम्यान ऑक्सिडायझरमध्ये द्रव ऑक्सिजन गळती आढळली होती. नंतरची तपासणी दरम्यान, ऑक्सिडायझर लाईनमध्ये वेल्ड क्रॅक (भेग) आढळली. ही भेग "रीसायकल आणि रिफर्बिशड" स्टेजमध्ये होती. ती अद्याप दुरुस्त केली नव्हती.इस्त्रोच्या तज्ज्ञांनी धरलेल्या आग्रहामुळे तो भाग बदलण्यात आला आणि पुन्हा चाचण्या करण्यात आल्या.डॉ. नारायणन हे क्रायोजेनिक इंजिन विकसित करणाऱ्या भारतीय पथकाचा भाग होते. त्यामुळे द्रव ऑक्सिजनसारख्या धोकादायक इंधनाशी संबंधित धोके त्यांना स्पष्ट माहीत होते.इस्त्रोच्या 13 सदस्यीय तज्ज्ञ पथकाने फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवर थेट हस्तक्षेप केला. त्यांनी "सेफ्टी फर्स्ट, लाँच लेटर" ही भूमिका घेतली. भारताचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे या मोहिमेत सहभागी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी इस्त्रोने आवश्यक तो धोरणात्मक निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पोलंड आणि हंगेरीनेही इस्त्रोच्या भूमिकेचे समर्थन केले.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला