ISRO ने वाचवले 4 अंतराळवीरांचे प्राण, भारताच्या शुभांशू शुक्लाचा समावेश असलेल्या रॉकेटचा संभाव्य अपघात टळला

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमुळे (ISRO) अंतराळातील संभाव्य अपघात टळला आहे. Axiom-4 मिशनसाठीच्या SpaceX Falcon-9 रॉकेटमध्ये उड्डाणापूर्वी आढळलेल्या गंभीर तांत्रिक दोषामुळे 4 अंतराळवीरांचा जीव धोक्यात येण्याची भीती होती. परंतु, इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या तांत्रिक सल्ल्यामुळे हा संभाव्य अपघात टळला आहे. यामध्ये भारताच्या शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) देखील सहभागी असल्याने ही घटना भारतासाठी अधिक महत्त्वाची ठरते.


इस्त्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी अमेरिकेतील Axiom-4 मोहिमेसाठी आवश्यक सुरक्षेच्या बाबतीत आपला ठामपणा दाखवत, फाल्कन-9 रॉकेटमधील संभाव्य धोका उघडकीस आणला. ही रॉकेट भारत, अमेरिका, पोलंड आणि हंगेरीच्या 4 अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार होती. "लिक" (गळती) असलेल्या रॉकेटचे प्रक्षेपण 11 जून रोजी नियोजित होते. पण, इस्त्रोने सखोल चाचण्या आणि "लो टेंपरेचर लिक टेस्ट" ची मागणी केली. स्पेसएक्सकडून यावर तात्पुरत्या उपायांची तयारी होती. परंतु, इस्त्रोने ती साफ नाकारली.


यासंदर्भातील माहितीनुसार 7 सेकंदांची हॉट फायर टेस्ट दरम्यान ऑक्सिडायझरमध्ये द्रव ऑक्सिजन गळती आढळली होती. नंतरची तपासणी दरम्यान, ऑक्सिडायझर लाईनमध्ये वेल्ड क्रॅक (भेग) आढळली. ही भेग "रीसायकल आणि रिफर्बिशड" स्टेजमध्ये होती. ती अद्याप दुरुस्त केली नव्हती.इस्त्रोच्या तज्ज्ञांनी धरलेल्या आग्रहामुळे तो भाग बदलण्यात आला आणि पुन्हा चाचण्या करण्यात आल्या.डॉ. नारायणन हे क्रायोजेनिक इंजिन विकसित करणाऱ्या भारतीय पथकाचा भाग होते. त्यामुळे द्रव ऑक्सिजनसारख्या धोकादायक इंधनाशी संबंधित धोके त्यांना स्पष्ट माहीत होते.इस्त्रोच्या 13 सदस्यीय तज्ज्ञ पथकाने फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवर थेट हस्तक्षेप केला. त्यांनी "सेफ्टी फर्स्ट, लाँच लेटर" ही भूमिका घेतली. भारताचे वैमानिक ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे या मोहिमेत सहभागी आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी इस्त्रोने आवश्यक तो धोरणात्मक निर्णय घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पोलंड आणि हंगेरीनेही इस्त्रोच्या भूमिकेचे समर्थन केले.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ