‘मॉन्सून’ने जोर धरल्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

रायगड, रत्नागिरीला ‘रेड’, तर पालघर, जळगाव, अहिल्यानगरला ‘ऑरेंज अलर्ट’


मुंबई : महाराष्ट्रात मॉन्सूनने जोर धरला असून, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी (दि. १४ जून) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) जारी केला आहे.


पुणे, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) लागू आहे.


हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच, अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे.


कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीम परिसरातील चक्राकार वाऱ्यांची स्थितीही पावसाला पूरक ठरत आहे.



नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन!


रायगड आणि रत्नागिरीतील रेड अलर्टमुळे स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे नदीकाठच्या गावांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्टमुळे प्रवास आणि दैनंदिन कामकाजात खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पालघर, जळगाव, अहिल्यानगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांत येलो अलर्ट असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे.



पावसाचा परिणाम आणि खबरदारी :


मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्ते, रेल्वे आणि स्थानिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर भूस्खलनाचा धोका असल्याने प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर